तुमचं मुंबईत, तर आमचं अयोध्येत! शिवसेना-भाजपमध्ये ऑफिस वॉर!

110

सध्या महाराष्ट्रातील विविध प्रमुख राजकीय नेत्यांचे उत्तर प्रदेशात दौरे सुरू आहे. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक मोठी घोषणा केल्याचे समोर आले आहेत. योगी सरकार मुंबईतील उत्तर भारतीयांसाठी मुंबईत कार्यालय सुरू करणार असल्याचे सांगितल्यानंतर ठाकरे सरकारही अयोध्येत आपले कार्यालय सुरू करणार आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचे राऊत म्हणाले.

मुंबईत उत्तर प्रदेश सरकारचे कार्यालय सुरू करण्यात येत असल्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. तर मनसे अध्यक्ष राज यांच्या परप्रांतिय विरोधी भूमिकेमुळे त्यांना उत्तर प्रदेशात विरोध होत असतानाच या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत, अशातच आता ठाकरे सरकारने देखील अयोध्येत आपले कार्यालय उघडणार असल्याचे सांगितले आहे.  मुंबईत योगी सरकारने कार्यालय सुरू करणार असल्याची घोषणा नुकतीच केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊत म्हणाले, त्यावर सरकार उत्तर देईल. कोणत्या जागेवर कार्यालय उभे करणार. मला वाटते, मुंबई, नवी मुंबईत अनेक राज्यांची कार्यालये आहेत. देश एक आहे असे आपण म्हणतो, तेव्हा आम्ही कोणत्याही राज्यात जाऊ येऊ शकतो. आम्हीही अयोध्येत जाऊन महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी एक सेंटर उभे करणार आहोत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली आहे. आम्हीही लखनौला करू, वाराणसीला करू. हा सरकार टू सरकार प्रश्न आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – कोरोनानंतर भारतात Tomato flu चं थैमान! ही आहेत लक्षणे)

कसा होणार उत्तर भारतीयांना फायदा?

महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईतल्या उत्तर प्रदेशातील रहिवाशांसाठी आपले कार्यालय उघडणार आहे. यूपी सरकारचे हे कार्यालय मुंबईत राहणाऱ्या यूपीमधील कामगारांच्या नोकऱ्या, व्यवसाय आणि सोयी आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काम करणार असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे 1.84 कोटी आहे, त्यापैकी 50 ते 60 लाख लोक उत्तर भारतातील आहेत आणि त्यापैकी बहुतांश उत्तर प्रदेशातील आहेत. उत्तर प्रदेशात राहणारे लाखो लोक मुंबईत राहतात, जे उद्योग, सेवा क्षेत्र, किरकोळ व्यापार, वाहतूक, खाद्य व्यवसाय, कारखाना किंवा मिल अशा अनेक क्षेत्रात काम करतात, त्यामुळे योगी सरकारच्या या निर्णयामुळे त्यांना निश्चित फायदा होण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.