लढाई लोकशाहीच्या रक्षणाची, आदिवासी, स्त्री-पुरुषाची नाही! राष्ट्रपती निवडणुकीवर शिवसेनेबाबत काय म्हणाले थोरात?

139

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांच्या बैठकीत खासदारांनी राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, असा आग्रह धरला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला, त्यामुळे आता राज्यात काँग्रेस नाराज झाली आहे. त्यांनी शिवसेनेप्रती नाराजी व्यक्त केली.

काय म्हणाले बाळासाहेब थोरात? 

काही दिवसांपासून तळ्यातमळ्यात सुरू असलेल्या शिवसेनेने अखेर एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा जाहीर केला आहे. पाठींबा जाहीर करताना आमच्यावर कोणताही दबाव नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, या निर्णयानंतर महाविकासआघाडीतील घटक पक्ष काँग्रेस नाराज झाला आहे. शिवसेना महाविकास आघाडीत आहे, पण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही, अशी खंत काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. गैरलोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले, अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे, असे मतही थोरातांनी व्यक्त केले.

(हेही वाचा काँग्रेसच्या राजवटीत पाकिस्तानची हुजरेगिरी! आयएसआयच्या एजंटला दिलेला राजाश्रय)

बाळासाहेब थोरात काय म्हणाले?

राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे. स्त्री, पुरुष किंवा आदिवासी, बिगर आदिवासी अशी ही लढाई नाही.जे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत ते सर्व यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा का दिला? त्यासाठी त्यांनी काही कारणही सांगितले, मात्र त्या पाठीमागील त्यांची खरी भूमिका काय ते शिवसेनेचे नेतृत्वच सांगू शकेल, त्याबद्दल आम्ही काय सांगणार? असं थोरात म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.