जमले ते मावळे आणि उडाले ते कावळे, सुभाष देसाईंचा भाजपवर निशाणा

143

जमले ते मावळे आणि उडाले ते कावळे, भाजपने काकवळ ठेवतात तशी काकवळ ठेवली आहे तोपर्यंत हे कावळे शितं टिपताय, पण ज्यावेळी भाजप हे शितं टाकणं बंद करेल तेव्हा हे कावळे काव काव करत उडून जातील. मात्र खरे मावळे हे उद्धव ठाकरेंसोबत कायम राहतील, असे म्हणून शिवसेनेचे नेते सुभाष देसाईंनी भाजपवर चांगलाच निशाणा साधला आहे.

दगा देणाऱ्यांची किव करावी तेवढी थोडीच

पुढे बोलताना देसाईंनी शिंदे गटावर देखील टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले, गर्दी करून शिंदे सेनेकडून महाराष्ट्राची दिशाभूल सुरू आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत आमची ताकद दाखवू असा इशाराही त्यांनी दिला आहे. सध्या लोक सरकारमध्ये बसल्याचा आव आणत आहेत. मात्र, हे सरकार मराठी भाषेबद्दल उदासीन असल्याचे उच्च न्यायालय म्हणते आहे. मराठीला वर्गाच्या बाहेर ठेवले आहे. एवढी अवहेलना शिंदे सरकारच्या काळात. हे कुडमुडे सरकार काढून टाका, असे म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोलाही लगावला. तसेच उद्धव ठाकरेंना दगा देणाऱ्यांची किव करावी तेवढी थोडीच आहे. उद्धव ठाकरेंनी जगाला हेवा वाटावे असे मुख्यमंत्रीपद सांभाळले असेही त्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात अवधूत गुप्ते आणि नंदेश उमप)

यावेळी सुभाष देसाईंनी सरकारला इशारा देत असे म्हटले की, महाराष्ट्राचे लचके तोडून मुंबईला खिळखिळे बनविण्याचे काम सुरू आहे. फॉक्सकॉन-वेदांता हा हातातोंडाशी आलेला घास गुजरातला गेला. स्वाभिमानी मराठी माणूस हे सहन करणार नाही. तसेच मुंबई महाराष्ट्रात रहावी असे वाटत असेल, तर सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठाम उभे राहिले पाहिजे, असे आवाहनही सुभाष देसाई यांनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.