छत्रपती शिवाजी महाराजांवर दोन ते तीन भागांत चित्रपट बनवणार – मनसे अध्यक्ष राज ठाकरे

157

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त करताना, राज ठाकरे म्हणाले की, काॅलेज सुरु असताना पहिल्यांदा माझ्या मनात असा विचार आला की, एक भव्य चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांवर आला पाहिजे. यानंतर मी पुन्हा वाचन करायला सुरुवात केली. मी बाबासाहेब पुरंदरे, रणजित देसाई वाचले. मी माझ्या आजोबांचे एक ब्रिटिश लेखकाचे पुस्तकही वाचले. हे सर्व वाचल्यानंतर माझ्या लक्षात आले की, शिवाजी महाराजांवर चित्रपट होऊ शकत नाही. मुंबईच्या विलेपार्लेमध्ये हर हर महादेव या चित्रपटानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे यांची अभिनेता सुबोध भावे यांनी मुलाखत घेतली, यावेळी ते बोलत होते. तसेच, शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त करताना, दोन ते तीन भागांत चित्रपट बनवण्याचा विचार असल्याचा ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, मला असे वाटते की, अफजल खान, पन्हाळा गडावरुन महाराज निघणे आणि विशाल गडावर जाणे, आग्र्यावरुन सूटका. या चार-पाच विषयांच्या पलीकडे प्रचंड मोठे शिवाजी महाराज आहेत. मला असे वाटते आपण फक्त या चार पाच प्रसंगांना घेऊन अडकलो, तर त्या माणसावर आपण अन्याय करत आहोत. ते म्हणाले, यावरुन माझ्या मनात आले की, आपण टीव्ही सिरिअल करु. यासाठी मी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्याशी बोललो. त्यांच्याशी या संबंधित माझी दोन ते तीन वेळी चर्चाही झाली. तेव्हा एकदा हीच चर्चा सुरु असताना, तिथे नितीन चंद्रकांत देसाई होते. ते म्हणाले, माझी तयारी आहे. मी त्यांना म्हणालो कर. त्यांची ती सिरिअल आलीही. त्याला खूप वर्षे झाली. आता सध्या मी दोन ते तीन भागांत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपट आणण्याचा विचार करत आहे. आता याविषयी काही बोलत नाही. मात्र, झालं तर यावर बोलूच, असे राज ठाकरे म्हणाले.

( हेही वाचा :शरद पवारांना लोकशाही हवेय की घराणेशाही? )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.