सरकारकडे भावनांचा दुष्काळ आणि घोषणांची अतिवृष्टी, उद्धव ठाकरेंचा घणाघात

122

शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे दौ-यावर आहेत. त्यांनी औरंगाबाद येथे बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतक-यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरजदार निशाणा साधला. या निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ आणि केवळ घोषणांची अतिवृष्टी असल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली आहे.

सरकारवर घणाघात

उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील देहागाव येथे नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर टीका देखील केली. या निर्दयी सरकारमध्ये घोषणांची अतिवृष्टी आणि भावनांचा दुष्काळ आहे, असा घणाघात यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

अन्न काय शिजवायचे हाच शेतक-यांपुढे प्रश्न

नैसर्गिक आपत्ती या आपल्या हातात नसतात पण ही संकटे आल्यानंतर सरकारचे कर्तव्य असते की शेतक-याला वा-यावर सोडायचे नाही. माझी आताची ही भेट प्रतिकात्मक आहे. सध्या आपण एका विचित्र अवस्थेत आहोत. एका बाजूला दिवाळी आहे तर दुसरीकडे शेतक-यांचे दिवाळे निघाले आहे. दिवाळीच्या सणात आपल्या घरात अन्न काय शिजवायचे असा प्रश्न आपल्या अन्नदात्याला पडला आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.