राज्यातील ‘या’ भागांत पारा १२ अंशावर

117

राज्यात नैऋत्य मोसमी वारे माघारी फिरताच थंडी अलगद पावलाने येऊ लागली आहे. मंगळवारी राज्यातील सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे नोंदवले गेले. महाबळेश्वरला किमान तापमान १२.३ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले.

(हेही वाचा – जगातील ‘सर्वात घाणेरडा व्यक्ती’चा मृत्यू; 65 वर्षांपूर्वी केलेली अखेरची आंघोळ, काय आहे कारण?)

ऐन दिवाळीत फटाक्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना राज्यातील बहुतांश भागांत मंगळवारी दोन ते तीन अंशाने किमान तापमानात घट दिसली. गुलाबी थंडीचा ऋतुमान जवळ येत असताना किमान तापमानातील घट आता सुखावू लागली आहे.

राज्यात मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घसरण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मात्र मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमान बहुतांश भागांत सरासरीएवढेच दिसून येत आहे. मंगळवारी राज्यातील सर्वात जास्त कमाल तापमान जळगावात नोंदवले गेले. जळगाव येथे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसवर दिसून आले. मध्य महाराष्ट्राखालोखाल सध्या कोकण आणि विदर्भातील किमान तापमानात घसरण सुरु आहे. त्यामुळे बुधवारीही तापमान घसरण कायमच राहणार असल्याचे संकेत वेधशाळेच्या अधिका-यांनी दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.