दिवाळीनिमित्त गावी जात असताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघे ठार, एक जखमी

127

वाशिम जिल्ह्यातील पुलगाव-जालना राष्ट्रीय महामार्गावर पांगरी कुटेजवळ कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.

(हेही वाचा – नोटांवर गांधींसह लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो हवा; केजरीवाल यांची मागणी)

मिळालेल्या माहितीनुसार, लिलाधर चोपडे हे पनवेल येथून त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह दिवाळीनिमित्त एमएच ४६ एयू ३०८९ क्रमांकाच्या कारने वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील परसुडी काकडा येथे जात होते. मालेगाव तालुक्यातील पांगरी कुटेनजीक त्यांच्या कारचा आणि ट्रकचा अपघात झाला. यात अपघातात त्यांची पत्नी सोनू चोपडे आणि मुलगा हार्दिक ठार झाला, तर वडील लिलाधर चोपडे आणि त्यांचा लहान मुलगा लावण्य गंभीर जखमी झाले होते. मात्र कालांतराने उपचारादरम्यान वडिलांचेही निधन झाले.

लावण्यवर वाशिमच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रकच्या धडकेत कारचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे अपघातग्रस्तांना क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. ऐन दिवाळीत झालेल्या या अपघातामुळे चोपडे कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.