![](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2024/07/fraud-696x377.webp)
-
प्रतिनिधी
मुंबईतील वांद्रे परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित “दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार” चे आयोजक अनिल मिश्रा आणि त्याचा मुलगा अभिषेक मिश्रा यांच्याविरुद्ध शासनाची फसवणूक (Fraud) केल्याच्या आरोपाखाली मुंबईतील वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंटरनॅशनल टुरिझम प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अनिल मिश्रा आणि त्यांचा मुलगा अभिषेक मिश्रा यांच्यासह इतरांविरुद्ध भादंविच्या कलम ३१८(४) आणि ३१९(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपांची चौकशी सुरू केली आहे.
(हेही वाचा – BMC : … म्हणून मालमत्ता अधिकृत ठरत नाही!; महापालिकेने असे का दिले स्पष्टीकरण?)
भारतीय जनता पक्षाच्या चित्रपट आघाडी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष समीर दीक्षित यांच्या निवेदनाच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर यांनी त्यांच्या निवेदनात दावा केला आहे की, “त्यांच्या कार्यालयाला माहिती मिळाली की १९ आणि २० फेब्रुवारी रोजी वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये “दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार” आयोजित केला जात आहे आणि हा कार्यक्रम “इंटरनॅशनल टुरिझम फेस्टिव्हल प्रायव्हेट लिमिटेड” द्वारे आयोजित केला जाणार आहे. समीर दिक्षित पुढे म्हणाले की, जेव्हा त्यांनी माहिती गोळा केली तेव्हा त्यांना कळले की या कंपनीचे संचालक अनिल मिश्रा आणि त्यांची पत्नी आहेत. असाही आरोप आहे की, अनिल मिश्रा यांनी इंटरनेटद्वारे या कार्यक्रमाचा प्रचार केला. अनिल यांनी त्यांच्या वेबसाइटवर राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि पर्यटन मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या शुभेच्छा पत्रे अपलोड केली आणि हा कार्यक्रम राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींनी दिलेल्या “दादासाहेब फाळके पुरस्कार” कार्यक्रमाचा एक भाग असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. (Fraud)
(हेही वाचा – Badlapur School Case प्रकरणी पोलिसांवर काय कारवाई केली? Bombay High Court कडून विचारणा)
दीक्षित यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात असाही दावा केला आहे की, अनिल मिश्राने व्हॉट्सअप आणि कॉलद्वारे लोकांना सांगितले की हा कार्यक्रम केंद्र सरकारचा कार्यक्रम आहे आणि असे सांगून त्याने १२ मोठ्या कंपन्यांकडून प्रायोजकत्व घेतले. याशिवाय, त्याने उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, पंजाब आणि महाराष्ट्राच्या पर्यटन विभागांकडूनही प्रायोजकत्व घेतले. दीक्षित यांनी असाही दावा केला की अनिल मिश्रा यांनी लोकांना सांगितले की या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री उपस्थित राहतील आणि तिकीट विक्री वेबसाइट प्रत्येक जोडप्यासाठी अडीच लाख रुपयांपर्यंत तिकिटे विकत होती. पोलिसांनी सांगितले की, समीरच्या जबाबाच्या आधारे आम्ही गुन्हा दाखल केला आहे आणि त्या जबाबात केलेल्या दाव्यांची चौकशी करत आहोत. (Fraud)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community