Rajasthan Accident : राजस्थानमध्ये भीषण अपघात! लग्न समारंभावरून परतत असताना कुटुंबातील १२ जणांचा मृत्यू

130
Rajasthan Accident : राजस्थानमध्ये भीषण अपघात! लग्न समारंभावरून परतत असताना कुटुंबातील १२ जणांचा मृत्यू
Rajasthan Accident : राजस्थानमध्ये भीषण अपघात! लग्न समारंभावरून परतत असताना कुटुंबातील १२ जणांचा मृत्यू

धौलपूरमधील राष्ट्रीय महामार्ग-11B वर एका वेगवान बसने टेम्पोला धडक (Rajasthan Accident) दिली. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला, तर बस चालक जखमी झाला. त्यांना धौलपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वजण लग्न समारंभ आटोपून परतत होते. मृतांमध्ये आठ मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व मृतदेह बारी रुग्णालयाच्या शवागारात ठेवले. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास बारी उपविभागात हा अपघात झाला. (Rajasthan Accident)

नेमकं काय घडलं?
बारी शहरातील करीम गुमट येथील रहिवासी असलेले सुमारे 15 जण सर्मथुरा भागातील बरौली येथे लग्न समारंभासाठी गेले होते. त्यापैकी बहुतेक मुले होती. रात्री उशिरा सर्वजण टेम्पोने बारीकडे परतत होते. रात्री अकराच्या सुमारास धौलपूरहून जयपूरकडे जाणाऱ्या भरधाव बसने राष्ट्रीय महामार्ग-11 ब वरील सुन्नीपूर गावाजवळ टेम्पोला धडक दिली. (Rajasthan Accident)यावेळी महामार्गावरून जाणारी इतर वाहने घटनास्थळी थांबून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी टेम्पोमध्ये बसलेल्या लोकांना बारी हॉस्पिटलमध्ये नेले. या अपघातात बसचेही नुकसान झाले असून, ती पोलिसांनी जप्त केली आहे. (Rajasthan Accident)

बारी हॉस्पिटलचे पीएमओ डॉ हरिकिशन मंगल यांनी सांगितले की, ही घटना रात्री 11 च्या सुमारास घडली. रात्री 12 वाजता जखमींना बारी रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय पथकाने सर्वांना तातडीने उपचार देण्याचा प्रयत्न केला. 14 लोकांना रुग्णालयात आणण्यात आले, त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला. चार जखमींना गंभीर अवस्थेत ढोलपूरला रेफर करण्यात आले, मात्र दोघांचा वाटेतच मृत्यू झाला. २ जखमींवर धौलपूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Rajasthan Accident)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.