RSS : रत्नागिरीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पथसंचलन रोखणाऱ्या मुसलमानांविरुद्ध गुन्हा दाखल

553
RSS : रत्नागिरीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पथसंचलन रोखणाऱ्या मुसलमानांविरुद्ध गुन्हा दाखल
RSS : रत्नागिरीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पथसंचलन रोखणाऱ्या मुसलमानांविरुद्ध गुन्हा दाखल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काढलेल्या विजयादशमी पथसंचलनात (RSS Vijayadashami path Sanchalan) घुसून मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी घोषणाबाजी केल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काल मध्यरात्री उमटली. या प्रकरणात माजी नगरसेवक मुसा काझीसह (Musa Qazi) १०० जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. संचलनात घुसणाऱ्यांवर कारवाईची मागणी करणाऱ्या संतप्त हिंदू जमावातील ४० जणांविरुद्धही तक्रार दाखल करण्यात आली आहे. (RSS)

विजयादशमीच्या पूर्वसंध्येला, ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता रत्नागिरीतील कोकणनगरनजीकच्या कदमवाडी क्र. १ येथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन सुरू होणार होते. तत्पूर्वी काही मीटर आत असलेल्या गार्डनच्या आवारात संघाचे कार्यकर्ते एकत्र आले. तेथून ते मुख्य मार्गावर येणार होते. त्याचवेळी मुस्लिम समाजाचा जमाव पथसंचलनाजवळ आला. त्यांना पोलिसांनी रोखले. यावेळी मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी अल्ला हू अकबरच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी त्यांना रोखल्यामुळे पथसंचलन रत्नागिरी शहराच्या दिशेने रवाना झाले. पथसंचलन संपल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पाटचे (BJP) कार्यकर्ते शहर पोलीस ठाण्यात रात्री एकत्र आले. माजी आमदार बाळासाहेब माने, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह संघ पदाधिकाऱ्यांनी संचलनात घुसणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी तक्रार देण्याची सूचना केली. वरुण सुंदरशाम पंडित यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून माजी नगरसेवक मुसा काझीसह १०० जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (RSS)

मध्यरात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संघाचे उपस्थित कार्यकर्ते आक्रमक झाले. आरोपींना तत्काळ अटक करा, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. पोलिसांनीही संशयितांचा शोध सुरू असल्याचे सांगितले. परंतु आक्रमक झालेल्या जमावाने पोलीस ठाण्यातून रात्री दीड वाजता थेट कोकणनगरकडे धाव घेतली. दरम्यान, कोकणनगर मार्गावरील चर्मालय येथे दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर जमाव थेट मुस्लिम मोहल्ल्यात घुसला. यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. उपस्थित पोलिसांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. यावेळी पोलिसांच्या दंगल नियंत्रण पथकाने सौम्य लाठीमार करीत जमावाला पांगवले. त्यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली.

(हेही वाचा – Mumbai Police : मुंबईत १५ पोलीस उपायुक्तपदी मुंबईबाहेरील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

या घटनेमुळे रत्नागिरी (Ratnagiri Hindu Muslim Controversial) शहरात तणाव निर्माण झाला असून शहर पोलिसांनी मुस्लिम समाजाच्या मुसा काझी यांच्यासह १०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार उमेश पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सागर प्रकाश कदम, यश नितीन सुर्वे, शुभम संजय साळवी यांच्यासह सुमारे ४० हिंदू कार्यकर्त्यांविरुद्ध बेकायदा जमाव करून मुस्लिम मोहल्ल्यात घुसून मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सध्या कोकणनगर येथे राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

मध्यरात्री घटनास्थळी पोलिसांनी चित्रीकरण केले होते. त्याआधारे उर्वरित आरोपींचा शोध शहर पोलिसांनी सुरू केला आहे. गुन्ह्यातील काहींना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. कोकणनगर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्यासह राखीव पोलीस दलाची तुकडी, दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.