महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

127
चेंबूर येथील सिंधी सोसायटी येथे झालेल्या कॉलेज विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने धारावी येथून दोघांना अटक केली आहे. ही हत्या प्रेमप्रकरणातून करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आदित्य गणेश त्रिभुवन (२१) आणि कल्पम इजाज सय्यद (२१) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. आदित्य हा गोवंडीतील निमोनी बाग येथे राहणारा असून कल्पम हा कल्याण कोनगाव येथे राहणारा आहे. आदित्यचे ज्या तरुणीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते, त्या तरुणीने आदित्यला सोडून वासीनाका येथे राहणारा मुद्स्सीर शेख याच्यासोबत मैत्री केली होती.
मुद्स्सीर हा चुनाभट्टी येथील स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये शिकत होता, त्याच कॉलेजमध्ये ही तरुणी शिकत होती. गुरुवारी सायंकाळी कॉलेज सुटल्यानंतर मुद्स्सीर हा कॉलेज च्या मैत्रिसोबत घरी जाण्यास निघाला असता आदित्य आणि कल्पम हे दोघे मोटारसायकल वरून आले व त्यांनी मुद्स्सीर यांच्यावर भररस्त्यात धारदार शस्त्राने हल्ला करून पोबारा केला होता. या हल्ल्यात मुद्स्सीर याचा मृत्यु झाला होता. चुनाभट्टी पोलीस ठाण्यात याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखा कक्ष ६ च्या पथकाने आदित्य आणि कल्पम यांचा शोध घेत शुक्रवारी धारावी येथून दोघाना अटक करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.