कर्नल संतोष बाबूंचा मरणोत्तर ‘महावीर चक्र’ पुरस्काराने गौरव

83

मंगळवारी राष्ट्रपती भवनात झालेल्या सभारंभात शूर सैनिकांना शौर्य पदके प्रदान करण्यात आली. आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गलवान खोऱ्यातील हिंसाचारात हुतात्मा झालेल्या जवानांना शौर्य पदक प्रदान केले. यादरम्यान, लडाखमधील गलवान व्हॅलीमध्ये ऑपरेशन स्नो लेपर्ड दरम्यान प्राण गमावलेले कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या आई आणि पत्नीला हा पुरस्कार प्रदान केला. महावीर चक्र हा भारतातील दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे.

‘या’ जवानांनाही देण्यात आले पुरस्कार

या कार्यक्रमात 4 पॅरा स्पेशल फोर्सचे सुभेदार संजीव कुमार यांना जम्मू आणि काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये एका दहशतवाद्याला ठार मारल्याबद्दल आणि इतर दोन जणांना जखमी केल्याबद्दल मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या पत्नीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला. सार्जंट के.ऑपरेशन स्नो लेपर्ड अंतर्गत मागच्या  वर्षी जूनमध्ये गलवान व्हॅलीमध्ये चिनी सैन्याने केलेल्या भ्याड हल्ल्याविरुद्ध पलानी यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या पत्नीला हा पुरस्कार प्रदान केला. त्याच्यासोबत गलवान व्हॅलीमध्ये ऑपरेशन स्नो-लेपर्ड दरम्यान चिनी सैन्यासोबत झालेल्या हिंसक चकमकीत हुतात्मा झालेल्या इतर पाच जवानांना वीर चक्र देण्यात आले.

5 सैनिकांना ‘वीर चक्र’

  • नायब सुभेदार नुदुराम सोरेन (१६ बिहार)
  • सार्जंट के. पिलानी (८१ फील्ड रेजिमेंट)
  • नाईक दीपक कुमार (आर्मी मेडिकल कॉर्प्स-16 बिहार)
  • शिपाई गुरतेज सिंग (३ पंजाब)
  • हवालदार तेजेंद्र सिंग (तृतीय मध्यम रेजिमेंट)

 (हेही वाचा :पहाटेच्या शपथविधीला २ वर्षे पूर्ण, पाटलांनी आता झोपेतून जागे व्हावे! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.