
मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा (Tahawwur Rana) याला तपासासाठी कुठे न्यायचे याचा निर्णय राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि केंद्रीय गृह मंत्रालय घेतील, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले. दिल्लीत एनआयएने न्यायालयाला सांगितले की, २००८ साली झालेल्या मुंबई हल्ल्यांमागील व्यापक कटाचा शोध घेण्यासाठी राणाची (Tahawwur Rana) चौकशी अत्यावश्यक आहे. डेव्हिड हेडली याने भारतात येण्यापूर्वी राणाला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या कटाची माहिती कळविली होती. तसेच आपली मालमत्ता व अन्य बाबींसंदर्भातही ई-मेल पाठविला होता. या कटात पाकिस्तानमधील इलियास काश्मिरी, अब्दुर रहमान यांचाही सहभाग असल्याचे एनआयएने न्यायालयाला सांगितले. (Tahawwur Rana)
राणाचा जबाब अतिशय महत्त्वाचा
तहव्वूर राणा (Tahawwur Rana) याने केवळ मुंबईच नव्हे तर भारतातील इतर शहरांमध्येही दहशतवादी हल्ले घडविण्याचा कट आखला होता असा युक्तिवाद एनआयएने दिल्लीतील न्यायालयात केला. हल्ल्याचा कट आखताना पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय तसेच कोणकोणते दहशतवादी गट सामील होते याची माहिती त्याच्याकडून मिळविली जाणार आहे. राणाशी आमचा कोणताही संबंध नाही, असे सांगून पाकिस्तानने हात झटकले आहेत. मात्र त्या देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर उघडे पाडण्यासाठी राणाचा जबाब अतिशय महत्त्वाचा आहे. (Tahawwur Rana)
हेडली राणाशी नियमित संपर्कात
२६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडली मुंबईत आला असताना तो राणाशी नियमित संपर्कात होता. दोघांनी परस्परांना २३०हून अधिक कॉल केले होते. राणा ‘मेजर इक्बाल’ नावाच्या आणखी एका आरोपीशीही संपर्कात होता. राणा स्वतःही नोव्हेंबर २००८ मध्ये, हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वी भारतात आला होता. चार्जशीटनुसार, तो पवईतील एका हॉटेलमध्ये थांबला होता. (Tahawwur Rana)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community