देशातील दहशतवादी कारवायांमध्ये झाली इतकी घट, गृहमंत्री अमित शहांनी दिली माहिती

162

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात सर्व राज्यांतील गृहमंत्र्यांच्या दोन दिवसीय चिंतन शिबिराला सुरुवात झाली आहे. या शिबिरात दहशतवादाबाबत माहिती देताना गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या 37 महिन्यांत देशातील दहशतवादी घटनांमध्ये 34 टक्के घट झाल्याची माहिती देली आहे. तसेच या दहशतवादी हल्ल्यात सुरक्षा दलांच्या जवानांच्या मृत्यूत 64 टक्के आणि नागरिकांच्या मृत्यूत 90 टक्के घट झाल्याचेही अमित शहा यांनी यावेळी सांगितले.

हे मोठे यश-शहा

2014 नंतर उग्रवादी घटनांमध्ये 74 टक्क्यांची घट झाली आहे. तसेच नागरिकांच्या मृत्यूंच्या संख्येत 90 टक्क्यांची घट झाली आहे. हे फार मोठे यश आहे. इतक्या कमी वेळेत नागरिकांच्या मृत्यूंमध्ये झालेली ही घट समानधारक आहे. तसेच गेल्या 37 महिन्यांत देशातील दहशतवादी घटनांमध्ये 34 टक्के घट झाल्याची माहिती दिली आहे.

(हेही वाचाः ‘…त्यासाठी पाकिस्तानला परिणाम भोगावे लागतील’, राजनाथ सिंह यांचा थेट इशारा)

एनआयएच्या प्रत्येक राज्यात शाखा

केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या एनआयएच्या प्रत्येक राज्यात शाखा स्थापन करणार असल्याची घोषणाही गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी केली आहे. एनआयएला व्यक्तिगत आतंकवादी घोषित करण्यासाठी यूएपीए अंतर्गत नुकतेच अधिकार देण्यात आले आहेत. नुकतीच एआयएने पीएफआय या संघटनेवर बंदी घातली आहे. तसेच आतंकवादी संघटनेशी संबंधित जमिनींवर कारवाई करण्याचे अधिकारही एनआयएला देण्यात आले आहेत. त्यामुळे 2024 पर्यंत एनआयएच्या प्रत्येक राज्यात शाखा स्थापन करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.