ट्रेनमधून रात्री प्रवास करताना करू नका ‘या’ चुका! अन्यथा होणार कारवाई; रात्रीचे दिवे लावण्यासंदर्भातही विशेष नियम…

137

रेल्वेचे जाळे संपूर्ण भारतात विस्तारलेले आहे. लांबच्या प्रवासासाठी अनेक जण रात्रीच्या प्रवासाला प्राधान्य देतात. प्रवाशांना प्रवासादरम्यान अधिकाधिक सुविधा देण्यासाठी रेल्वेमार्फत अनेक प्रयत्न केले जातात. अनेकदा रात्री प्रवासादरम्यान सहप्रवाशांकडून त्रास सहन करावा लागतो यासाठी आता रेल्वेने नियमांत बदल करत पालन न केल्यास कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.

( हेही वाचा : गेली १२ वर्ष आमचं कोकण समृद्धीची वाट बघतंय…समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यावर मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत)

तर होणार कारवाई 

भारतीय रेल्वेने प्रवाशांना अधिकाधिक चांगली सेवा देण्यासाठी हे नियम बनवले आहेत. प्रवाशांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून रात्री १० वाजल्यानंतर रेल्वेत जोरजोरात गाणे वाजवाल, मोठ्या आवाजात गप्पा माराल तर कारवाई होईल असे सांगितले आहे.

लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये अनेकदा रात्रीच्या वेळी काही प्रवाशांच्या बेशिस्त वर्तनामुळे प्रवाशांना त्रास होतो त्यांची झोपमोड होते. या तक्रारींची गंभीर दखल रेल्वेकडून घेण्यात आली आहे. याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यासही सुरूवात झाली असून संबंधित प्रवाशावर कारवाई करण्यात येणार आहे. कोणीही नियम मोडले तर रेल्वेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा देण्यात आला आहे. तिकीट चेंकिंग स्टाफ, टीईटी, कोच अटेंडंट, मॅनेजमेंट स्टाफ, टीसी यांनाही याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेत लांब पल्ल्याच्या गाडीत रात्री १० नंतर फोकस लाईट वगळता सर्व इतर लाईट बंद करण्यात याव्यात असे आवाहनही रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.