ब्राह्मणांच्या आडून हिंदूंच्या बदनामीचे केंद्र; जेएनयू

119

स्वतःला लिबरल्स किंवा सेक्युलर्स म्हणवून घेणारा समाज खरं पाहता अत्यंत प्रतिगामी आणि रक्तपिपासू आहे. जाती-अंताची लढाई लढण्याचं ढोंग हे लोक करतात, परंतु यांना जातीचा अंत करायचा नसून, त्या जातीच्या लोकांचा अंत करायचा आहे. द काश्मीर फाइल्स या चित्रपटामुळे काश्मीरी हिंदुंवर झालेले अनन्वित अत्याचार जगासमोर आले. याआधी देखील लोकांना याविषयी माहिती होतं, परंतु या चित्रपटाने वाचा फोडली.

आता अशाचप्रकारचा नरसंहार पुन्हा एकदा करण्याची धमकी जेएनयूमध्ये देण्यात आली आहे. “ब्राह्मण भारत छोडो”, “Brahmo-Baniyas – We are coming for you”, There will be BLOOD”, Brahmins Leave the campus” अशा प्रकारची धमकी जेएनयूमध्ये देण्यात आली आहे. भिंतींवर हे धमकीवजा संदेश लिहून ठेवले आहेत. काश्मीरमध्येदेखील हिंदूंना बर्‍याचदा धमकी देण्यात आली. त्यानंतर एके रात्री हिंदुंचा नरसंहार करण्यात आला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात नरसंहार होऊनदेखील भारतभरातील हिंदूंना त्याबद्दल काहीच वाटलं नाही. त्याकाळी हिंदू खरोखर कुंभकर्णाच्या अवस्थेत होता. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता हिंदू जागा झाला आहे.

हे लिबरल्स लोक सुरुवातीला ब्राह्मणांना दूषणे देतात, आता यांनी आपली स्ट्रॅटजी बदलली आहे. ब्राह्मणांसह त्यांनी बनिया या समाजालादेखील धमकी दिली आहे. परंतु लक्षात घ्या, ब्राह्मण म्हणजे केवळ ब्राह्मण नसतो. तर ब्राह्मण म्हणजे हिंदू समाज होय. कारण ह्यांना मुळात हिंदुत्व मान्य नाही. हे लोक मूलनिवासी हिंदूंचा द्वेष करतात. हा धर्म ब्राह्मणांनी निर्माण केला असं नॅरेटिव्ह मांडतात. त्यामुळे जेव्हा ते ब्राह्मणांना दूषणे देतात तेव्हा ते सबंध हिंदू धर्माला दूषणे देत असतात आणि आता त्यांनी मुद्दामहून बनिया असा उल्लेख केला आहे. बनिया म्हणजे भांडवल असणारे लोक. थोडक्यात यांची जुनी थियरी भांडवलशाही. आता आपण भांडवलशाहीच्या विरोधात लढा देतोय असा दिखावा करणार.

( हेही वाचा: पुरातत्व विभागाचे अधिकारीच गड-किल्ल्यांवरील इस्लामी अतिक्रमणाला जबाबदार! )

यांना हिंदू नकोत आणि हिंदूंचा कणा असलेली आर्थिक व्यवस्थादेखील यांना नेस्तनाबूत करायची आहे. जेणेकरून हिंदूस्थान बेचिराख होईल. यांचा हेतू भारत नष्ट करण्याचा आहे. जे औरंगजेबाच्या मनात होतं, तेच यांच्या मनात आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेएनयूच्या भिंतींवर दिलेली धमकी म्हणजे देशभरातील हिंदूंना चेतावणी आहे. पुन्हा एकदा काश्मीरसारखा नरसंहार करण्याचीच ही धमकी आहे. केंद्र आणि स्थानिक सरकारने ही बाब गंभीरपणे घेतली पाहिजे. जेएनयू विद्यापीठातून ही घाण कशी बाहेर निघेल याकडेही लक्ष दिलं पाहिजे. खुनशी प्राध्यापक खुनशी विद्यार्थी घडवत आहेत. ही देशासाठी धोक्याची घंटा आहे. चर्चा करुन सोडून देण्याची ही गोष्ट नसून याविरोधात वैचारिक लढा सुरु करण्याची नितांत गरज आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.