‘ब्रेक लागणं कठीण, अपघात अटळ’, राऊतांचा रोख नेमका कोणावर?

246

राज्य विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची रविवारी मुंबईत जाहीर सभा झाली. या उत्तर सभेत उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर वैफल्यग्रस्त झाल्याची टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी फडणवीस यांना इशाराही दिला आहे. सोमवारी राऊतांनी केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले की, उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते. अपघात अटळ आहे.

(हेही वाचा – ‘धर्मवीर’मधला ‘तो’ प्रसंग पाहणं उद्धव ठाकरेंनी टाळलं, चित्रपट अर्धवट सोडून थिएटरबाहेर!)

संजय राऊत यांनी भाजपवर टीका करत शिवसेनेची ताकद पाहायची असल्यास मुंबईत या, असे विरोधकांना म्हटले होते. आपला पक्ष कोणापुढेही नमणार नाही, असा इशारा देत त्यांनी सर्व मनसुबे बोलून दाखवले होते. आम्ही संघर्ष करत राहू, लढत राहू. आम्हाला संघर्षाची सवय आहे. आजची सभा शंभर सभांची बाप आहे. आजची सभा हेच सांगते की, मुंबईचा बाप शिवसेना फक्त शिवसेना आहे. कोणाला पाहायचं असेल, आजमवायचं असेल तर मुंबईत या. मुंबईचा बाप शिवसेना असून आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, असे राऊत म्हणाले.

हे राज्य, हा पक्ष हा पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच आणि बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेने चाललेला आहे. आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही ना आम्हाला गर्दी आणावी लागत नाही. काही लोक हे राज्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक प्रश्न निर्माण केलेत, काही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही जी पोटदुखी आहे, ही जी काही लोकांची जळजळ असल्याचे राऊतही म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.