भर मंत्रिमंडळ बैठकीत अब्दुल सत्तारांना फडणवीसांनी झापले

77

शिंदे गटाच्या कोट्यातून मंत्री झालेल्या अब्दुल सत्तार यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर मंत्रिमंडळ बैठकीत झापल्याची माहिती समोर आली आहे. कॅबिनेटमध्ये निर्णय होण्यापूर्वीच एका योजनेची परस्पर घोषणा केल्यामुळे फडणवीसांनी सत्तारांना हा ‘शाब्दिक प्रसाद’ दिला.

( हेही वाचा : अस्मा खान निघाल्या ‘कृष्णा हिंग’च्या मालकीण, संबंध ‘टेरर फंडिंग’शी)

केंद्रीय कृषी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यातही अशी योजना राबवण्यासंदर्भात सरकारकडून विचारविनिमय सुरू आहे. थेट दुसरी योजना आणायची की केंद्राच्या योजनेत राज्याचा अतिरिक्त वाटा द्यावा, यावरही विचार केला जात आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यासंदर्भात सातत्याने वरिष्ठ अधिकारी आणि सचिवांसोबत बैठका घेत आहेत. मात्र, योजनेला मूर्तरुप येण्याआधीच अब्दुल सत्तार यांनी माध्यमांकडे त्यासंदर्भात वाच्यता केली. त्यामुळे फडणवीस नाराज झाले.

काय म्हणाले फडणवीस?

कृषी सन्मान योजनेबाबत कोणताही निर्णय झालेला नसताना तुम्ही ही माहिती जाहीर केलीच कशी, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. भर मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीसांकडून दरडावून विचारणा झाल्याने सत्तारांची बोलती बंद झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सत्तारांना खडसावले. त्यावर, मी निर्णय झाल्याचे जाहीर केले नाही, त्याबाबत विचार सुरू असल्याचे म्हणालो, अशी सफाई अब्दुल सत्तार यांनी दिली. परंतु, देवेंद्र फडणवीसांचे त्यावर समाधान झाले नाही.

फडणवीसांनी भरला दम

सरकारचा कोणताही निर्णय जाहीर करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना असतो. एखाद्या योजनेबाबत मंत्रिमंडळ स्तरावर विचारविनिमय सुरू असताना त्याची घोषणा केल्यास गांभीर्य राहत नाही. त्यामुळे कोणतीही घोषणा करताना आमच्याशी चर्चा करा, परस्पर घोषणा करू नका, असा सज्जड दम फडणवीस यांनी भरला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.