अजित पवार म्हणतात, वाईन पिणारे राज्यात कमी, काळजी नको!

123

वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. आपल्या राज्यातले अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळे तयार करतात. द्राक्ष, काजूपासून वाईन तयार होते. अशी अनेक फळे आहेत. आपल्याकडे वाईन पिणाऱ्यांचे प्रमाण अतिशय अल्प आहे. जेवढी वाईन तयार होते, तेवढी आपल्या राज्यात खपत नाही. इतर राज्यांत आणि काही परदेशात निर्यात होते. काही देश पाण्याऐवजी वाईन पितात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण काहींनी जाणीवपूर्वक मद्य राष्ट्र वगैरे म्हणून त्याला महत्त्व दिलं आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले.

राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर त्यावरून बराच वाद सुरू झाला आहे. भाजपाने या मुद्द्यावरून राज्य सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली असताना आता राज्य सरकारकडून देखील जोरकसपणे बाजू मांडली जात आहे.

(हेही वाचा श्रीमलंग गडाच्या बाजूचा पहाडेश्वर पर्वतही मुसलमानांच्या ताब्यात! वन विभागाची भूमिका संशयास्पद)

सरकारबाबत लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न

शेवटी आम्ही सरकारमध्ये काम करत असताना जनतेचे नुकसान होईल वगैरे असे काही करणार नाही. सुविधा देणे वेगळे, मध्य प्रदेशने घरपोच दारू पोहोचवण्याचे निर्णय घेतले आहेत. त्यांचे त्यांना लखलाभ. आपण निर्णय घेताना त्यात दारू नाही, तर वाईन विक्रीसाठी परवानगी दिली आहे. पण काही लोकांनी व्हिडीओ क्लिप वगैरे काढून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, सरकारबाबत लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

शिवसेनेने केलेली टीका

यासंदर्भात सामना अग्रलेखातून टीका करताना ‘राज्यातील भाजपा देशी नवसारीची दारू प्यायल्याप्रमाणे बरळू लागला आहे, असा खोचक टोला शिवसेनेने लगावला आहे. ‘वाईन आणि दारू यातला फरक विरोधी पक्षाला चांगलाच माहिती आहे. तरीही महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला वाईन चढली आहे व ते सरकारच्या विरोधात बोंब मारीत आहेत’, असे देखील यात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.