सनातन धर्म सर्वश्रेष्ठ आहे, भाजपच्या नेत्या रुबी आसिफ खान यांचे वक्तव्य

114

सध्या मुस्लिम धर्मामध्ये हिंदू धर्मद्वेष वाढत आहे, धर्मांधतेमुळे या समाजाकडून विविध प्रकारचा जिहाद चालवला जात आहे, अशा परिस्थितीत भाजपच्या नेत्या रुबी आसिफ खान यांनी केलेले वक्तव्य विशेष लक्ष केंद्रित करत आहे. त्या म्हणाल्या की, आता मुस्लीम समाजातील लोकांनाही कळू लागले आहे की भगवान श्रीराम हेच पैगंबर होते, तसेच सनातन धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे, असे त्या म्हणाल्या.

काय म्हणाल्या रुबी खान? 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रबुद्ध संमेलनामुळे हिंदू-मुस्लीम ऐक्य अधिक बळकट झाले आहे. अनेक मुस्लीम नागरिक या संमेलनाला गेले होते. योगी आदित्यनाथ यांच्या आगमनावेळी प्रबुद्ध संमेलनात मुस्लिम समाजातील लोकांनी जय श्री रामचे नारे दिले, असेही त्या म्हणाल्या. हा हिंदुस्तान आहे आणि इथे सर्वांना मिळूनमिसळून राहायला हवे. देशाचे देशाचे नाव असेच पुढे जात राहिले पाहिजे. अशा सगळ्या गोष्टींसाठी कट्टरपथींच्या निशाण्यावर मी नेहमीच राहिली आहे. पण मी त्यांना कधीच घाबरणार नाही, असेही रुबी खान म्हणाल्या. मी नमाज आणि पूजा अर्चाही करत राहीन, याआधीही माझ्याविरोधात फतवे जारी केले गेले आहेत आणि माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिली गेली आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना काही होऊ शकते, याची लेखी तक्रारही मी दिली आहे, असेही रुबी खान म्हणाल्या.

(हेही वाचा राज ठाकरेंचे भोंग्यांविरोधात पुन्हा रणशिंग; ‘अरेला का रे’ करा!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.