Amrita Fadnavis : सत्तेसाठी काहींना वडिलांच्याच शब्दांचा विसर; अमृता फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला

192
Amrita Fadnavis : सत्तेसाठी काहींना वडिलांच्याच शब्दांचा विसर; अमृता फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला
Amrita Fadnavis : सत्तेसाठी काहींना वडिलांच्याच शब्दांचा विसर; अमृता फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला

प्रभु श्रीरामांनी वडिलांना दिलेल्या वचनासाठी वनवास पत्करला होता; पण काही लोक सत्तेसाठी वडिलांच्या शब्दांना विसरतात, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी केली आहे. अमृता फडणवीस यांनी नाव न घेता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोला लगावला आहे. मुंबईत (Mumbai) रामकथेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.

(हेही वाचा – Deepak Kesarkar: पैसे मागणारे आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप करतात, दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला)

आपण श्रीरामाच्या जीवनातून शिकतो

अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या की, आपली जीवनशैली कशी असावी, आपल्या मर्यादा काय असाव्यात, हे आपण रामकथेतून शिकतो. श्रीरामाच्या जीवनातून शिकतो. प्रभु श्रीरामांनी वडिलांना दिलेल्या वचनासाठी वनवास स्वीकारला होता. इथे काही लोक असेही आहेत, ज्यांना सत्तेसाठी वडिलांचा शब्द लक्षात देखील राहत नाही.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था असणे गरजेचे आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे सदैव तत्पर आहेत. राज्यात शांतता राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस लक्ष देतील, अशा प्रकारे अमृता यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.