‘ही दोस्ती तुटायची नाय…’ रश्मी ठाकरेंना मिसेस फडणवीसांचे आश्वासन

102

शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकमेकांवर अनेकदा टीका करण्यात आली. शिवसेनेत झालेल्या उठावानंतर राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला आहे. पण नुकत्याच एका मराठी कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी रश्मी ठाकरे यांना आपली मैत्री कायम राहील, असा विश्वास दिला आहे.

एका मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी अमृता फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा फोटो पाहून काय बोलावं वाटतं असं विचारण्यात आलं. त्यावेळी अमृता फडणवीस यांनी हे विधान केलं आहे.

(हेही वाचाः अखेर ठरलंच! मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेवर शिक्कामोर्तब)

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

कशा आहात? सगळं ठीक आहे ना? सामना छान रंगवत आहात. तुम्ही ज्याप्रकारे घर सांभाळता ते पाहून तुमचा खरंच आदर वाटतो आणि तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळतं. बाकी चढ-उतार हे चालूच असतात, पण आपण कायमंच एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी राहणार आहोत, असे अमृता फडणवीस यांनी या कार्यक्रमात रश्मी ठाकरे यांना म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंना टोला

याच कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला देखील लगावला. पिंजरा सिनेमातील ‘कशी नशीबानं थट्टा आज मांडली’, हे गाणं ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांचाच चेहरा येतो, असा टोला अमृता फडणवीस यांनी लगावला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.