अमृता फडणवीस विचारतात, ‘देशमुख, परमबीर सिंग हनिमूनला गेलेत का?’

81

या सगळ्यांना मस्ती आली आहे का? माजी गृहमंत्री अनिल देशमुख, तसेच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह कुठे हनिमूनला गेले आहेत का?, असा खोचक सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केला. अशा प्रकारे वक्तव्य करून अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

कुठे दिसले तर रिपोर्ट करा!

‘एक पोलिस आयुक्त असो किंवा माजी गृहमंत्री असो, त्यांचे कुठे हनिमून चालले आपल्याला माहीत नाही. पण हे व्हायला नको ही खरी गोष्ट आहे. तुम्हाला पण कुठे दिसले तर रिपोर्ट करा. लवकर पकडता येईल त्या लोकांना’, अशा शब्दात देशमुख आणि सिंह यांच्या गायब होण्यावरुन अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर आसूड ओढले.

(हेही वाचा : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चाकणकरच!)

ड्रग्स प्रकरणातील कारवाईचे जोरदार समर्थन

अमली पदार्थ विरोधी कारवाईचे समर्थन करताना त्या म्हणाल्या की, ‘इथे लोक ड्रग्ज घेऊन फिरतात. कारण कोणी दिले, लोकांनीच दिले ना. यावर काम करावे की नाही करावे? महाराष्ट्र प्रगतीच्या दृष्टीने पुढे जावा की ड्रग्स कॅपिटल बनावा? हे आपल्यालाच ठरवायचे आहे. तरुणाईला तुरुंगात टाकावे हा माझा वैयक्तिक विचार नाही. त्यांना सुधारणागृहाची जास्त गरज आहे. पण त्या आधी ड्रग्ज कुठून येते, त्याचे नेटवर्क काय आहे, हे कळायला पाहिजे. ते कळल्यावर त्या मुलाला तुरुंगाची नाही, तर रिहॅबिलिटेशन आणि काऊन्सिलिंगची गरज असते’, असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.