अमृता फडणवीस यांच्याकडे राज्य सोडून जाणे हा एकमेव उपाय – अनिल परब

115

मुंबईने माणुसकी गमावली आहे आणि निरपराध, स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नाही असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले होते. अखेर या टिकेला शिवसेनेने उत्तर दिले असून, परिवहन मंत्री अनिल परब यांनी अमृता फडणवीस यांना भाजपाचे सरकार आणि सत्ता गेली म्हणून असुरक्षित वाटू लागल्याचे म्हणत त्यांच्यासाठी हे राज्य सोडून जाणे हाच एक उपाय असू शकतो अशी टीका केली आहे. भाजपा सरकार सत्तेत असताना गेली पाच वर्ष अमृता फडणवीस आणि सरकारने पोलिसांचे कौतुक केले. तसेच पोलिसांच्या पाठिमागे ठामपणे उभ्या राहिल्यात असे देखील अनिल परब म्हणालेत. तसेच मुंबईतील असा कुठला नागरिक म्हणला आहे की, आम्ही असुरक्षित आहोत? अमृता फडणवीस यांना असुरक्षित वाटण्यासारखं काय घडलंय? त्याच पोलिसांची सुरक्षा घेऊन आज त्या फिरत आहेत, असा टोला देखील अनिल परब यांनी अमृता फडणवीसांना लगावला.

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस

“ज्या प्रकारे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हाताळलं जात आहे, ते पाहून मला वाटतंय की मुंबईने माणुसकी गमावली आहे आणि निरपराध, स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नाही असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले होते. दरम्यान युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. “मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्याच मुंबई पोलिसांची Security Cover घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता?? सोडून द्या की security cover भरोसा नसेल तर,” असे ट्विट वरून यांनी केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.