आसामचे मुख्यमंत्री दाखल करणार राहुल गांधींविरोधात याचिका

149

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा कॉंग्रेस नेते राहुल गांधींविरोधात अवमान याचिका दाखल करणार आहेत. त्यामुळे राहुल गांधींच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अदानींसोबत आपले नाव जोडणे हे अवमानाचे कृत्य असल्याचे हिमंता सरमा यांनी म्हटले असून पंतप्रधान मोदींचा दौरा झाल्यानंतर आपण आसाम न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

( हेही वाचा : ‘हा’ व्याघ्रप्रकल्प ठरला संपूर्ण देशात सर्वोत्तम!)

राहुल गांधींना इशारा 

अदानी प्रकरणामध्ये हिमंता बिस्वा सरमा यांचे नाव जोडण्यासाठी राहुल गांधी यांनी ADANI नावाचे प्रत्येक अक्षर वापरले. यामध्ये काँग्रेसच्या अशा 5 नेत्यांची नावे लिहिली होती, ज्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री हिमंता सरमा म्हणाले की, अदानींसोबत आपले नाव जोडणे हे अवमानाचे कृत्य असल्याचे आहे. राहुल यांनी जे काही ट्विट केले आहे ते अपमानास्पद आहे. पंतप्रधान मोदींचा दौरा झाल्यानंतर आपण आसाम न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या 14 एप्रिलनंतर राहुल गांधींविरोधात खटला दाखल करणार असल्याचा इशारा आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी दिला.

https://twitter.com/ANI/status/1645044082597847043

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.