‘डोस’ घेतल्याशिवाय राहुल गांधींचे डोके चालत नाही; अतुल भातखळकर यांचा सणसणीत टोला

105

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधींनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा सर्वच स्तरातून तीव्र निषेध केला जात आहे. भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनीही या वक्तव्याचा समाचार घेतला असून, ‘डोस’ घेतल्याशिवाय राहुल गांधींचे डोके चालत नाही, असा सणसणीत टोला लगावला आहे.

सवंग लोकप्रसिद्धीसाठी काँग्रेसचे नेते राहूल गांधी हे कायम स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करत असतात. भारत जोडो यात्रेत याआधीच त्यांनी भारतीय संस्कृती, हिंदू देवतांचा अवमान केला असताना, आता वीर सावरकरांविषयी अवमानकारक वक्तव्य केले आहे. राहुल यांची यात्रा कर्नाटकात पोहोचली. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना ‘संघ आणि सावकरकरांनी इंग्रजांना मदतच केली. वीर सावरकरांना तर इंग्रजांकडून पैसे मिळत होते’,असे संतापजनक वक्तव्य केले.

(हेही वाचा राहुल गांधींनी पुन्हा ओकली गरळ, वीर सावरकरांचा अवमान, उद्धव ठाकरे निषेध करणार का, फडणवीसांचा सवाल!)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध केल्यानंतर आता भाजपकडून राहुल गांधींवर चौफर टीका होऊ लागली आहे. राहुल गांधी यांना सडेतोड प्रत्युत्तर देताना भाजपाचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे हा थोडा क्रॅक आहे. डोस घेतल्याशिवाय याचे डोके चालत नाही. त्यांच्यासोबत मिळून जनाब उद्धव ठाकरे हिंदुत्व व्यापक करताहेत. एक मूर्ख आणि दुसरा बेशरम.

त्यांच्या अज्ञानाची कीव – बावनकुळे

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेले विधान पाहता त्यांच्या अज्ञानाची कीव करावीशी वाटते. तसेही ते भारतात फारसे नसतात. अचानक कुठे परदेशी जातात हे काँग्रेसवाल्यांनाही माहिती नसते. आता भारतात आहेत, तर देशाबद्दलचे अज्ञान दाखवीत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रखर देशभक्तीबद्दल प्रत्येक भारतीयाला आदर आहे. सावरकरांनी देशासाठी केलेल्या असीम त्यागाबद्दल राहुल गांधी यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. ‘भारत जोडो’यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी देश तोडण्याचे काम करीत आहेत, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.