उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मुंबईच्या विकासाची मारेकरी; अतुल भातखळकर यांची टीका

87

स्वतःला हिंदुत्व, मराठी आणि मुंबईचे ठेकेदार मानणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी हिंदू समाज आणि मुंबईतील जनतेत फूट पाडण्याचे घाणेरडे काम सुरू केले आहे. त्यांनी मुंबईच्या विकासात खोडा घातला असून, मुंबईच्या विकासाची खरी मारेकरी उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना असल्याची जहरी टीका भाजपा मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी केली.

( हेही वाचा : IPL2023 : मुंबई इंडियन्सने पोलार्डसह ५ खेळाडूंना केले बाहेर; चेन्नईने जडेजाबाबत काय भूमिका घेतली? )

मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित ‘जागर मुंबईचा’ या अभियानंतर्गत जाहीर सभेत ते शनिवारी बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर उपस्थित होते. भातखळकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे कर्तृत्व असे आहे की, त्यांच्या नावातून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव हटवायला हवे. शिवप्रताप दिनानिमित अफजलखानाच्या कबरीवरील अतिक्रमण हटवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने केले. मात्र, सामना वर्तमानपत्रात याची बातमी नाही. कंगना राणावतचे घर पाडले तेव्हा त्याची हेडलाईन होती.

दगाबाजी करून मुख्यमंत्रीपद मिळवले

उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी करून मुख्यमंत्री पद मिळवले. मुंबईतील अनेक प्रकल्प रोखण्याचे काम उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मुलाने केले. कोणताही व्यवसाय न करता उद्धव ठाकरे यांची संपत्ती करोडो रुपये कशी? महापालिकेतून येणारे खोके बंद झाल्यामुळे उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले आहेत असा टोला भातखळकर यांनी लगावला. मुंबई मेट्रोच्या वाढत्या खर्चाला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. कोरोना काळात उद्धव ठाकरे किंवा त्यांचा मुलगा एकदाही घराबाहेर पडला नाही. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बाहेर पडून समाजासाठी काम करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरे डॉक्टर असून त्यांच्यामुळेच अडीच वर्षे घरात बसलेले घराबाहेर पडू लागले आहेत. आता त्यांचे आजारपण कुठे गेले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.