“…आणि शेजारी वाघाचे कातडे पांघरुन निपचित बसलेले म्यांव देखील नाही करत?”; भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल

114

आम आदमी पार्टीचे प्रमुख तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शुक्रवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

( हेही वाचा : उद्धव ठाकरे यांनी बांधलेले शिवबंधन सोडणार शिवसैनिक?)

या भेटीदरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अरविंद केजरीवाल म्हणाले, “कोरोना काळात आपण सर्व एकमेकांकडून बरचं काही शिकलो. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘बॉम्बे’ आणि महाराष्ट्रात चांगले काम करून कोरोनावर नियंत्रण मिळवले. आम्ही दिल्लीचे नागरिक सुद्धा महाराष्ट्र आणि बॉम्बेकडून बरेच काही शिकलो.” पत्रकारपरिषदेमध्ये केजरीवालांनी मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा चुकीचा केल्यामुळे आता त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे.

दिल्लीचा ठग मुंबईला “बॉम्बे” म्हणतोय…

याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर निशाणा साधला आहे. “दिल्लीचा ठग मुंबईला “बॉम्बे” म्हणतोय… आणि शेजारी वाघाचे कातडे पांघरुन निपचित बसलेले म्यांव देखील नाही करत?” असा खोचक सवाल भातखळकरांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

दरम्यान, यासंदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही बॉम्बे नाही “मुंबई” !! असे ट्वीट आणि व्हिडिओ शेअर करत अरविंद केजरीवालांवर टीकास्त्र सोडले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.