रामदास कदम म्हणजे ‘तात्या विंचू’, एकेरी उल्लेख करत भास्कर जाधवांचा कदमांवर घणाघात

93

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी रत्नागिरीतील खेडमध्ये भव्य जाहीर सभा घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यापूर्वी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर घणाघात केला. शिवाय रामदास कदम यांचा एकेरी उल्लेख करत शेलक्या शब्दात भास्कर जाधवांनी टोला लगावला.

काय म्हणाले भास्कर जाधव?

‘इथे काही लोकं आम्हाला सांगतात. तो एक चित्रपट होता झपाटलेला, त्यातला तात्याविंचू हा रामदास कदम आहे. यांचा एक कलमी कार्यक्रम आहे. रोज सगळ्या गावात फिरतात आणि सांगतात, उद्धव ठाकरेंनी मला संपवलं. खरंतर उद्धव ठाकरेंनी यांच्यासारखी बांडगूळं का बाळगली होती, ते देवालाच माहिती. रामदास कदम रोज बोलतो, आदित्य ठाकरेंनी माझं खातं पळवलं. अरे तुला पर्यावरण शब्द तरी बोलता येतो का रे? असा एकेरी उल्लेख करत भास्कर जाधवांना कदमांवर घणाघात केला.

पुढे जाधव म्हणाले की, ‘रामदास कदमांना मातीत घालायचं असेल, तर येथे संजय कदमांना आणावं लागेल. याबाबत आमचं एकमतं झालं आहे. अनेकांवर केसेसे झाल्या, जप्ती करण्यात आली, माझं घर जाळण्याचं काम केलं. पण, रामदास कदमांसारख्या भंपक माणसाला पुरून उरल्याशिवाय राहणार नाही.’

(हेही वाचा – शिवसेना, भाजपचं मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन; भव्य बाईक रॅलीनंतर ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात आशीर्वाद यात्रा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.