मलिकांच्या राजीनाम्यासाठी आता भाजप रस्त्यावर

110

राष्ट्रवादीचे प्रवक्ता, मंत्री नवाब मलिक यांच्यावर कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी जमीन खरेदीचा व्यवहार केल्याच्या आरोपाखाली अटकेत आहेत. त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. मात्र तरीही ठाकरे सरकार मंत्री मलिक यांचा राजीनामा घेत नाही, त्यामुळे भाजप आता रस्त्यावर उतरणार आहे.

…तरीही मोर्चा काढणारच

ठाकरे सरकारने मलिक यांचा राजीनामा न घेण्याच्या मुद्यावर ठाम आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक बनले आहे. अर्थसंकल्पिय अधिवेशनाचे सुरूवातीचे दोन दिवस मंत्री मलिक यांचा राजीनामा मागितला पण त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले, त्यामुळे अखेर भाजपने याकरता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. याकरता भाजपाच्या वतीने ९ मार्च रोजी मलिक यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

(हेही वाचा आयकर विभागच्या रडारवर आता अनिल परबांचे निकटवर्तीय!)

सरकारवर दाऊदचा दबाव

या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाही दिली, तरी परवानगी झुगारून भाजप मोर्चा काढणार आहे. सरकारला नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावाच लागेल. मलिकांचा राजीनामा का घेतला जात नाही. त्यांचा राजीनामा न घेण्याबाबत कुणाचा दबाव होता का? कदाचित मलिक यांचा राजीनामा घेऊ नये म्हणून दाऊदचा दबाव असेल असा माझा अंदाज आहे, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांचे व्यक्तीमत्व पाहता त्यांना मलिक यांचा राजीनामा घ्यायचा आहे, पण त्यांच्यावर दबाव आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. काहीही झाले तरी भाजपचा मोर्चा निघणारच. परवानगी मिळो अथवा न मिळो, असेही पाटील म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.