“रक्तपिपासू ‘ठाकरे सरकार’मुळेच एसटीच्या ४० कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या”

60

आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची रविवारी भेट घेत ॲड आशिष शेलार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना साथ आणि समर्थन देत असल्याचे सांगितले. यावेळी आशिष शेलार यांनी सरकारला चेतावणी दिली आणि म्हणाले की गुमान चर्चा करा, सोपा मार्ग काढा, सरळ विलनीकरण करा त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करा. एसटी कर्मचाऱ्यांच्या ४० जणांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेलं हे ठाकरे सरकार रक्तपिपासू असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली.

(हेही वाचा – ‘एमपीए’मधील २२ पोलीस प्रशिक्षणार्थींना कोरोनाचा विळखा)

ही लढाई केवळ एसटी कर्मचाऱ्यांची नाही तर…

एसटीचे राज्य शासनात विलनीकरण तसेच सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळण्यासाठी मुंबईत आझाद मैदानात सुरु असलेल्या एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियाच्या आंदोलनाला भेट देत आपला पाठिंबा, साथ असल्याचे ॲड आशिष शेलार यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. ‘शासकीय कर्मचाऱ्याला जे फायदे मिळतात, ओळख मिळते ती द्या एवढीच मागणी आहे. यासाठी केवळ एक वाक्याचा जीआर काढायचा आहे. राज्य सरकारला सर्व सहकार्य करु, पण नाही केले तर आम्ही परत येतोय हे लक्षात ठेवा’, असा इशाराही त्यांनी दिला. ही लढाई केवळ एसटी कर्मचाऱ्यांची नाही तर महाराष्ट्रातल्या गोरगरीब, दलित, पिडित, वंचित समाजाला न्याय देण्याची लढाई आहे, असेही शेलार म्हटले.

Shelar

मायावी राक्षसासारखं हे सरकार आहे…

आझाद मैदानासमोर मुंबई महापालिका आहे. जिथे ८० हजार कोटींचे फिक्स डिपॅाझिट आहेत पण इथे मराठी माणूस आंदोलन करतोय, त्यांना लाईट आणि पाण्याची ही सुविधा दिली जात नाही. या सत्ताधाऱ्यांना लाज कशी वाटत नाही, असा सवाल ही शेलार यांनी केला. सोमवारी यासाठी महानगरपालिका आयुक्तांची यासाठी भेट घेणार असल्याचंही ते म्हणाले. मायावी राक्षसासारख हे सरकार शब्दांत सामान्यांना भुलवत आहे. यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. काळीज नसलेलं हे सरकार आहे. मंत्री म्हणतात, एसटी रक्तवाहिनी आहे मग तुम्ही आता रक्तपिपासू का बनलात? असा सवाल त्यांनी यावेळी केला. ४० जणांचे बळी तुम्ही घेतलेत अशी टीका त्यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.