पेंग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम जाहीर करावा, शेलारांचा शिवसेनेला टोला

73

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीवरून सध्या नवा वाद सुरू आहे. या कबरीचं सुशोभिकरण केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग आली. यानंतर या कबरीवरील सजावट, एलईडी लाईट्स मुंबई पोलिसांना काढून टाकल्या. मात्र या प्रकाराने सर्वच स्तरातून राग व्यक्त केला जात आहे.

मेमनची कबर फुलांनी सजवण्यात आल्याचा एक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून भाजपाने आता शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

(हेही वाचा – देशभरातील तब्बल ६० तिरूपती मंदिरं ‘या’ दिवशी राहणार बंद! काय आहे कारण?)

काय म्हणाले शेलार

पेंग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम जाहीर करावा, शिवसेना दाऊदचा प्रचारक म्हणून काम करतो, असा खोचक टोला आशिष शेलारांनी शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लगावला. भाजपच्या इतर नेत्यांकडून देखील हाच मुद्दा धरून शिवसेनेवर निशाणा साधला जात आहे. याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभिकरणावरुन भाजपचे आमदार राम कदम यांनी देखील उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभिकरण झाले, असा आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.