शिंदेंना मुख्यमंत्री केल्याने आपण दु:खी होतो; चंद्रकांत पाटलांचे मोठे वक्तव्य

125

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर, राज्यात सत्तासंघर्ष निर्माण झाला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर सत्तासंघर्षावर पडदा पडला. राज्यातील युती सरकारचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. आता याबाबत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

नाईकांनंतर फडणवीस हे पाच वर्ष पूर्ण करणारे मुख्यमंत्री 

पुण्यात झालेल्या पदाधिका-यांच्या बैठकीत बोलताना, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की गेल्या अडीच वर्षातील चित्र पाहिल्यानंतर राज्यात सत्ता बदलण्याची गरज होती आणि तसा बदल झाला. हा बदल होत असताना, असा एक नेता देण्याची गरज होती जो योग्य मेसेज देईल. जो चांगल्या निर्णयांना स्थिरता देईल, असे असताना आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्त्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे आपल्या सर्वांना दु:ख झाले. वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले ते देवेंद्र फडणवीस आहेत.

( हेही वाचा: गिरीष महाजनांचे खंडणी आणि रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण CBI कडे वर्ग? )

पाच वर्षे मुख्यमंत्री राहिल्यानंतर, कोणाला वाटलं नव्हतं, पण केंद्राने निर्णय दिला आणि देवेंद्र फडणवीस यांनी तो मानला. यासाठी आपण सर्वांनी त्यांना सॅल्यूट केला पाहिजे, असे सांगत सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांनी फडणवीस यांना सॅल्यूट केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.