‘संजय राठोड हा विषय आता आपण थांबवूया’, चित्रा वाघ यांचे मोठे विधान

100

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात येत होते. हे प्रकरण भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी चांगलेच लावून धरले होते आणि त्यांनी त्यासाठी तत्कालीन सरकारकडे राठोडांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली होती. राज्यात शिंदे-फडणवीस सरकरामध्ये राठोडांना मंत्रीपद देण्यात आल्यानंतर सुद्धा चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली होती. पण आता चित्रा वाघ यांनी या प्रकरणावरुन मोठं विधान केलं आहे.

संजय राठोड यांच्याशिवाय राज्यात अनेक विषय आहेत त्यामुळे त्यांचा विषय आपण सध्या संपवूया, असे विधान चित्रा वाघ यांनी केले आहे.

(हेही वाचाः काँग्रेसच्या खांद्यावर राहूलचे ओझे अन सर्वांच्या खांद्यावर काँग्रेसचे ओझे…)

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

अमरावती दौ-यावर असताना चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत संजय राठोड यांच्याबाबत विधान केले आहे. संजय राठोड हा विषय सध्या आपण संपवूया. त्यांच्याविरोधातील माझा न्यायालयीन लढा हा सुरुच राहील. त्यांच्यापेक्षा इतरही मोठे प्रश्न महाराष्ट्रात आहेत, असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले आहे.

त्यांनाही प्रश्न विचारा

महाविकास आघाडी सरकारच्या काळातच संजय राठोड यांना क्लीन चीट मिळाली आहे. त्यामुळे काही प्रश्न तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील विचारा, असेही चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.