मुंबईतील जिहादींना नवाब मलिक, अस्लम शेख पोसतात; नितेश राणेंचा गंभीर आरोप

116

लव्ह जिहाद, धर्मांतरण आणि लॅण्ड जिहाद विरोधात कायद्याची मागणी करत मुंबईत रविवारी सकाळी ‘सकल हिंदू समाजा’च्या वतीने ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’निघाला. दादर येथील मैदानातून निघालेला या मोर्चाचा कामगार मैदान, प्रभादेवी येथे समारोप होणार आहे. या मोर्चात हिंदू संघटनेंच्या नेत्यासह भाजप आणि शिंदे गटाचे नेते सहभागी झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना भाजप आमदार नितेश राणे यांनी नवाब मलिक आणि अस्लम शेख यांच्या गंभीर आरोप केला आहे. मुंबईत येणाऱ्या बांगलादेशी, रोहिंग्या आणि जिहादींना नवाब मलिक आणि अस्लम शेख पोसत असल्याचा आरोप नितेश राणे यांनी एका मराठी खासगी वृत्तवाहिनीसोबत बोलताना केला आहे.

‘मुंबईचा डीएनएन हा भगवाच’

भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, ‘हे हिंदुंच भगवं वादळ आहे. हे काही भगवं वादळ आता थांबणार नाही. कोणी कितीही जिहादी आणून इथे हिरवे झेंडे दाखवायचा प्रयत्न केला, तरीही पण मुंबईचा डीएनए हा भगवाच आहे. आमचं रक्त भगवंचं आहे हे मुंबईकरांनी परत एकदा हिंदू जनआक्रोश मोर्चातून दाखवून दिलं आहे.’

‘जिहादी मुंबईतील हिंदूंची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करतायत’

पुढे नितेश राणे म्हणाले की, ‘तुम्ही मुंबईतल्या हिंदूंना वाकड्या नजरेने बघालं. तर हिंदू संख्येनं पण जास्त आहे, ताकदीनं पण जास्त आहे. म्हणून परत हे बांगलादेशी, रोहिंग्या, जे जिहादी विचारांचे लोकं मुंबईत येऊन मुंबईतील हिंदूंची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करतायत. अॅण्ड जिहाद आणि लव्ह जिहाद निमित्तानं आमच्या माता-भगिनींना, स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतायत या सगळ्यांना चोख उत्तर मुंबईतला हिंदू देऊ शकतो, हेच दाखवण्याचा आजच्या मोर्च्याचा इशारा आहे.’

‘रोहिंग्या आणि बांगलादेशींना हे लोकं जावयांसारखे पोसतात’

‘अडीच वर्ष महाविकास आघाडीच्या काळात आम्ही जे सहन केलं. तसंच मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या माध्यमातून हिंदूंवर द्वेष झाला. मुंबईत येणाऱ्या बांगलादेशी, रोहिंग्या आणि जिहादींना कोण पोसत? कोण त्यांना आधारकार्ड देत? हेच ते नवाब मलिक आहेत, हेच ते अस्लम शेख आहेत. आज जो काही ड्रग्स, मटका, जुगार हे अवैध्य धंदे, अमली पदार्थाचं रॅकेट चालवलं जातंय, त्याच्याच माध्यमातून या जिहादींना मोठं करण्याचा प्रयत्न होतोय. रोहिंग्या आणि बांगलादेशींना हे लोकं जावयांसारखे पोसतात,’ असे गंभीर आरोप राणेंनी केले.

‘सरकार लवकरच लव्ह जिहादचा कायदा आणेल’

‘लव्ह जिहाद विरोधात कायदा येणं ही काळाची गरज आहे. माझ्या माता-भगिनींना लव्ह जिहादच्या नावानं फसवायचं, हिंदू नाव बदलून मुस्लिम नाव ठेवायचं, नमाज वगैरे करायला लावायचा. तुमचं जर कोणावर प्रेम असेल तर लव्ह जिहादच्या निमित्तानं धर्मांद करायची गरज नाही. पण हिंदूंची लोकसंख्या कमी करण्याचं हे मोठं षडयंत्र आहे. जे लव्ह जिहादच्या कायदा आणल्यानंतर ते बंद करायचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार लवकरच लव्ह जिहादचा कायदा आणेल हा विश्वास आहे’, असे नितेश राणे म्हणाले.

(हेही वाचा – प्राचार्याला मारहाण केल्याप्रकरणी संतोष बांगरांसह ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.