भाजपच्या ‘या’ दोन आमदारांनी जे काही केले, त्याने कांदेंचे वांदे झाले

146

हाय व्होल्टेज राज्यसभा निवडणुकीत अखेर भाजपने आपले सर्व उमेदवार जिंकवून करून दाखवले. या निवडणुकीत प्रत्येक मताला सोन्याची किंमत असल्यामुळे शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या बाद झालेल्या एका मताची सध्या जोरदार चर्चा आहे.

शिवसेनेचे हे मत बाद होण्यात वाघ-सिंहाचा वाटा होता तो भाजप आमदार आशिष शेलार आणि नितेश राणे यांचा. त्यामुळे आता राणे विरुद्ध शिवसेना असा वाद पुन्हा रंगण्याची चिन्हे आहेत.

(हेही वाचा: राज्यसभा निवडणुकीचा चित्तथरारक निकाल, कोल्हापूरच्या ‘या’ मल्लानं अखेर मारलं मैदान! वाचा संपूर्ण आकडेवारी)

नेमकं झालं काय?

शुक्रवारी राज्यसभा निवडणुकीवेळी भाजप आमदार नितेश राणे हे पोलिंग एजंटची भूमिका बजावत होते. याच दरम्यान नितेश राणे यांना सुहास कांदे यांनी मतदान करताना नियमांचे उल्लंघन केल्याचे लक्षात आले.ही गोष्ट नितेश राणे यांनी आशिष शेलार यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर भाजपने सुहास कांदे यांचे मत बाद करण्याची विनंती केली.

(हेही वाचा: शिवसेनेला ‘कांदे’ महागात पडले, या कारणांमुळे बाद झाले मत)

निवडणूक आयोगाने मत ठरवले बाद

विधान भवनातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या संपूर्ण मतदान प्रक्रियेची तपासणी करण्यात आली व त्यानंतर आयोगाने शिवसेना आमदार सुहास कांदे यांचं मत अवैध ठरवलं. त्यामुळे एकूण 284 आमदारांची मतं ग्राह्य धरुन त्यानुसार मतमोजणी करण्यात आली. पण शिवसेनेच्या दुस-या उमेदवारासाठी प्रत्येक मत हे निर्णायक असल्यामुळे शिवसेनेला या निवडणुकीत कांदेंच्या मताचा फटका बसल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.