शिवसेना आता मांजरीचा आवाज काढण्याच्या सुद्धा लायकीची राहिली नाही, राणेंचा घणाघात

149

राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद महाराष्ट्राला काही नवा नाही. भाजप आमदार नितेश राणे यांनी आता पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार प्रहार केला आहे. एकेकाळी वाघाची डरकाळी फोडणारी शिवसेना आता मांजरीचा आवाज काढण्याच्या लायकीची राहिलेली नाही, असा घणाघात नितेश राणे यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे आता नर्सरीत नाहीत

शिवसेना नेते व मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसे ही भाजपची ‘सी’टीम असल्याची टीका केली होती. त्यांच्या या टीकेला नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हे ए, बी, सी, डी यातून आदित्य ठाकरेंनी जरा बाहेर पडावं. आता ते मंत्री झाले आहेत, हे असं बोलायला आता ते नर्सरीत नाहीत. शिवसेना आता कोणाची टीम झाली आहे. एकेकाळी वाघाची डरकाळी फोडणारी शिवसेना आता मांजरीचा आवाज काढण्याच्या सुद्धा लायकीची राहिलेली नाही त्यामुळे त्यांनी दुस-याला बोलू नयेत, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली आहे.

(हेही वाचाः राऊतांनाही देशमुख आणि मलिकांच्या पंगतीत शिवभोजन जेवायला बसवावं, राणेंचा टोला)

शिवसेनेत फक्त दोघंच राहतील

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत देखील नितेश राणे यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. शिवसेनेत आता फक्त उद्धव आणि आदित्य ठाकरे हे दोघंच राहतील, बाकीचे सर्व शिवसैनिक आता भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सूचक विधान नितेश राणे यांनी केले आहे.

(हेही वाचाः राऊतांबाबत राज ठाकरेंची ती भविष्यवाणी खरी होणार? वाचा काय म्हणाले होते)

‘संजय राऊत 420’

आयएनएस विक्रांतवरुन संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केलेल्या आरोपांवरुन नितेश राणे यांनी राऊतांवर टीका केली आहे. चोरी करणारा माणूसच दुस-यांवर आरोप करत आहे. सर्वात मोठा भ्रष्टाचारी आणि चोर कोण आहे, हे महाराष्ट्राने पाहिले आहे. सामान्य माणसांनी बँकेत ठेवलेला पैसा चोरण्याचं काम संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे संजय राऊत 420 हा पिक्चर आता महाराष्ट्र बघेल, असा आरोप त्यांनी केला आहे.

(हेही वाचाः विक्रांत युद्धनौकेच्या नावावर 58 कोटींची रक्कम लाटली राऊतांचा सोमय्यांवर देशद्रोहाचा आरोप!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.