…तर राहुल गांधी खाकी पँट घालून RSSच्या दसरा मेळाव्यात दिसतील – नितेश राणे

91

काँग्रेसचे नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान होणाऱ्या पत्रकार परिषदेत भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांवर (आरएसएस) सातत्याने निशाणा साधताना दिसत आहेत. दरम्यान राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कौरवांची उपमा दिली होती. याच पार्श्वभूमीवरून भाजपचे नेते नितेश राणे यांनी राहुल गांधींवर जहरी टीका केली आहे. जर राहुल गांधींना दाढी काढून रेशीम बागेत पाठवलं तर पुढच्या वर्षी ते संघाच्या दसरा मेळाव्यात खाकी पँट घालून पहिल्या रांगेत दिसतील, असे नितेश राणे म्हणाले.

नितेश राणे नक्की काय म्हणाले? 

वर्धा येथील भाजप कार्यक्रमात बोलत असताना नितेश राणेंनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ‘राहुल गांधी विकासासंदर्भात बोलतात का? काँग्रेसचा एक नेता विकासासंदर्भात बोलतोय का? भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने झालेल्या राहुल गांधींच्या कोणत्याही पत्रकार परिषदेत फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करायची, फक्त हिंदू धर्मावर टीका करायची, फक्त साधूसंतांवर टीका करायची, फक्त सावरकरांवर टीका करायची बाकी काहीच नाही. म्हणजे मला मतदान का करावं असं त्यामध्ये काहीचं नाही. नुसतं फक्त हिंदू समाज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकर यापलीकडे त्यांचं काहीचं नाही. मी तर सांगतो, त्यांची एकदाच दाढी काढा आणि आमच्या रेशमी बागेत पाठवा. पुढच्या दसऱ्या मेळाव्यात राहुल गांधी खाकी पँट घालून पहिल्या रांगेत बसलेले दिसतील, माझी गँरंटी आहे. कारण त्यांच्याकडे दुसरा अजेंडा नाही. बोलायचं आहे म्हणून नुसत बोलतोय.’

राहुल गांधी काय म्हणाले होते?

आरएसएस म्हणजे एकविसाव्या शतकातले कौरव असून हे कौरव पँट घालून हातात काठी घेऊन शाखेत जातात. हिंदुस्थानातले दोन-तीन सगळ्यात श्रीमंत अरबपती त्यांच्याकडे असल्याचे राहुल गांधी म्हणाले होते.

(हेही वाचा –मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘आता उद्धव ठाकरेंनी लवकर भूमिका जाहीर करावी’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.