पदांच्या भरतीसाठी सुरू आहे ‘दलाली’! फडणवीसांचा गंभीर आरोप

याकडे सरकारने वेळीच लक्ष दिले नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे. 

107

राज्यात एमपीएससीच्या परीक्षांच्या सावळ्या गोंधळावरुन भाजपाने राज्य सरकारला घेरले असतानाच आता आरोग्य विभागातील पदांच्या परीक्षा अचानक परीक्षेच्या केवळ एक दिवस रद्द केल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पदांच्या भरतीसाठी काही दलाल पैसे गोळा करत असून, याकडे सरकारने वेळीच लक्ष दिले नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण

विद्यार्थ्यांमध्ये सरकारबाबत प्रचंड रोष आहे. आरोग्य विभागातील परीक्षांबाबत स्वतः आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा कुठल्याही परिस्थितीत रद्द केल्या जाणार नाहीत, असे फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून सांगितले होते. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असेही यावेळी टोपे यांनी सांगितले.

(हेही वाचाः आरोग्य विभागाच्या परीक्षा अचानक रद्द! काय आहे कारण? वाचा)

त्यानुसार अफवा बाजूला सारुन विद्यार्थ्यांनी आरोग्य मंत्र्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि परीक्षा देण्यासाठी गावागावांतून विद्यार्थी पैसे खर्च करुन परीक्षा असलेल्या ठिकाणांवर आले. पण अचानक आदल्या रात्री त्यांना परीक्षा रद्द झाल्याचे समजत आहे. त्यामुळे या सरकारमध्ये नेमकं काय चाललं आहे, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

पदांसाठी सुरू आहे दलाली

परीक्षांच्या आयोजनाबाबत कुठलंही ताळतंत्र सरकारमध्ये नाही. वेगवेगळ्या ठिकाणची प्रवेशपत्र देण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या मनात मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण केला जात आहे. काही दलाल सध्या बाजारात आले असून, ते या पदांच्या भरतीसाठी पैसे गोळा करत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत, असाही आरोप फडणवीस यांनी केला आहे.

(हेही वाचाः जळगावात 11 नगरसेवकांनी भाजपाचे वाजवले ‘बारा’! बांधले शिवबंधन)

आंदोलनाचा इशारा

हे अतिशय गंभईर असून सरकारने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. वारंवार परीक्षांच्या बाबतीत गोंधळ निर्माण करुन विद्यार्थ्यांचं नुकसान करणं लवकरात लवकर थांबलं नाही, तर यासंदर्भात आम्ही आंदोलन करू, असा गंभीर इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.