राऊत, ठाकरे अज्ञातवासात जातील; Chandrashekhar Bawankule यांची टीका

उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजी नगरमध्ये केलेल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केल्यामुळे चंद्रशेखर बावनकुळेंनी अशी बोचरी टीका केली आहे.

153
विधानसभेसाठी भाजपा बूथ स्तरापर्यंतची संघटना सक्षम करणार; Chandrashekhar Bawankule यांची माहिती

चार जून नंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत अज्ञातवासात जातील, असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. (Chandrashekhar Bawankule)

उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजी नगरमध्ये केलेल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) जोरदार टीका केली आहे. मोदींनी त्यांचा आत्मा सैतानाला विकला आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला होता. तसेच संजय राऊत यांनीही मोदी हे ४ जून नंतर माजी पंतप्रधान असतील असे म्हटले आहे. त्यानंतर आता हे दोघेही ४ जून नंतर अज्ञातवासात निघून जातील अशी बोचरी टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली. (Chandrashekhar Bawankule)

(हेही वाचा – जेव्हा पक्ष कमजोर होतो तेव्हा Sharad Pawar काँग्रेसमध्ये जातात; फडणवीसांचा हल्लाबोल)

महाराष्ट्राचे जनमत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) पाठिशी आहे. नरेंद्र मोदींनी दहा वर्षांत केलेली विकासकामे जनतेसमोर मांडली आहेत. महाराष्ट्रात आमच्या अंदाजानुसार आम्हाला मोठ्या प्रमाणावर जागा मिळतील. तसेच मोदी हे पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी महाराष्ट्र पुन्हा एकदा खंबीरपणे त्यांच्यामागे उभा राहिल यात शंका नाही. असमसे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. (Chandrashekhar Bawankule)

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, उद्धव ठाकरे बावचळले आहेत. त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे या दोघांची अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर दोघांनाही अज्ञातवासात जावे लागणार आहे, अशी महाराष्ट्राची जनता त्यांची स्थिती करणार आहे असा टोला बावनकुळेंनी लगावला. (Chandrashekhar Bawankule)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.