अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतल्यावर राज ठाकरेंचे पुन्हा फडणवीसांना पत्र, म्हणाले…

134

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित अंधेरी पोटनिवडणूक लढवू नये असे आवाहन केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या पत्राचा गांभीर्याने विचार करू असे सांगितले होते. यानंतर आता भाजपने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपने माघार घेतल्यानंतर राज ठाकरेंनी फडणवीस आणि भाजपचे आभार मानले आहेत.

( हेही वाचा : पाच वर्षांत केंद्राने महाराष्ट्राला दिले 223 प्रकल्प; परंतु राज्याची कामगिरी निराशाजनक)

राज ठाकरेंचे फडणीवसांना पत्र

राज ठाकरे यांनी ट्विटरवर पत्र लिहित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात याबद्दल आपले आणि आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा शतश: आभार असे ट्वीट राज ठाकरेंनी केले आहे.

या पत्राद्वारे ते म्हणाले, चांगली, सकारात्मक, राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो त्याला तुम्ही प्रतिसाद दिला याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार असे आपल्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे.

भाजपच्या निर्णयानंतर भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनीही अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले तसेच आपल्यावर कोणताही दबाव नाही, निराशही नाही पक्षाचा आदेश महत्त्वाचा आहे असे सांगताना ऋतुजा लटके यांना मुरजी पटेल यांनी शुभेच्छा दिल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.