१२ आमदारांच्या निलंबनाच्या विरोधात भाजपचे राज्यभर आंदोलन

68

ओबीसी आरक्षणासंबंधी भाजपच्या आमदारांनी विधानसभेत गदारोळ केला, त्यामुळे भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. त्याच्या निषेधार्थ भाजपने राज्यभर आंदोलने सुरु केली. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मंगळवार, ६ जुलै रोजी सकाळपासूनच राज्यभर ठिकठिकाणी १२ आमदारांच्या निलंबनाच्या विरोधात निदर्शने केली.

नागपुरात निदर्शने

भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वात नागपुरातील बडकस चौकात आंदोलन करण्यात आले. त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडी सरकारचे नेते, मंत्र्यांचे पुतळे जाळण्यात आले. महाराष्ट्र सरकारने विधानमंडळाचा वापर करुन जुलूमशाही केली, हुकूमशाही केली आणि 12 आमदारांना निलंबित केले. महाराष्ट्र सरकारने विधीमंडळाचा वापर राजकीय कामांसाठी केला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या मनात तीव्र रोष आहे. राज्यातील दीड हजार ठिकाणी कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. जोपर्यंत आमदारांचे निलंबन रद्द होत नाही तोपर्यंत राज्यात आंदोलन सुरु राहील, अशी टीका भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

(हेही वाचा : भास्कर जाधव सोंगाड्या! नितेश राणेंचा घणाघात)

कांदिवलीत मोर्चा

मुंबईतील कांदिवली भागात भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून मोर्चा काढला. यावेळी भास्कर जाधव आणि महा विकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. त्यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. लोकशाही बुडवणाऱ्या या निर्णयाविरोधात आमदार अतुल भातखळकर यांच्या कांदिवली पूर्व विधानसभेत कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन सकाळीच रस्त्यावर उतरले. वसूली सरकारचा निषेध असो, ठाकरे सरकार हाय, हाय… अशा घोषणा देऊन त्यांनी संतप्त निदर्शनने केली. निलंबनाने जनतेतही असलेला आक्रोश यानिमित्ताने समोर आला. आंदोलन जनताही उत्स्फूर्तपणे सामील झाली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना अटक केली. ‘हे ठरवून रचलेले कारस्थान होते. सरकारविरुद्ध सातत्याने आक्रमक असलेल्या आमदारांना हा बनाव रचून लक्ष्य करण्यात आले. त्यांना विधीमंडळाच्या कामकाजापासून दूर ठेवण्याचा हा डाव आहे. १७० आमदार हाताशी असून ठाकरे सरकारची तंतरली आहे’, अशी जळजळीत टीका करून मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी सरकारची खेळी उघड केली. कांदिवली पूर्वसह मुंबईत अन्य ठिकाणीही ठाकरे सरकारच्या या काळ्या कृत्याचा जळजळीत निषेध करण्यात आला.

पुण्यातही घोषणाबाजी 

भाजपच्या १२ आमदारांच्या निदर्शनाच्या विरोधात पुणे येथेही भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून ठाकरे सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली आणि सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.