नालेसफाईचे काम अपूर्ण, कंत्राटदारांची बिले रोखा: भाजपची मागणी

95
मुंबईतील नालेसफाईच्या कामाबाबत नाखूष असलेल्या भाजपने सर्व नालेसफाई कामाची चौकशी करण्याची मागणी महापालिका आयुक्त व प्रशासक यांच्याकडे केली आहे. मुंबईतील अपूर्ण नालेसफाईची दक्षता विभागामार्फत चौकशी करण्यात यावी. जोपर्यंत चौकशीचा अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत संबंधित कंत्राटदारांना कोणत्याही प्रकारच्या देयकाचे अधिदान करण्यात येऊ नये, अशी मागणी भाजपने केली आहे.  याबाबत तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा मुंबईकरांच्या हितासाठी भारतीय जनता पक्षामार्फत जन आंदोलन छेडण्यात येईल, असाही इशारा भाजपने दिला आहे.
भाजपचे चारकोपमधील आमदार योगेश सागर महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल  यांना निवेदन देत ही मागणी केली आहे. सागर यांनी आपल्या पत्रात, मुंबई शहरात गेल्या आठ दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहरातील नालेसफाईची पोलखोल झालेली आहे. मुंबई शहरातील सर्वच नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ व कचरा साचला असल्यामुळे पाण्याचा निचरा झालेला नसल्याची चिंता व्यक्त केली.

10 टक्केही नालेसफाई  नाही

यावर्षी मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी सुमारे ८३.९ कोटी तसेच छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी सुमारे १०२.३५ कोटी एवढा खर्च करूनही नाल्यांची विदारक स्थिती पाहता १० टक्के देखील नालेसफाई झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे. कंत्राटदारांनी केवळ कागदावर देयके सादर केलेली आहेत. प्रत्यक्षात मात्र नाले सफाई न झाल्याने मुंबईकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे म्हटले आहे.
नाहीतर जनआंदोलन छेडू
मुंबई शहरातील अपूर्ण नालेसफाईची दक्षता विभागामार्फत चौकशी करण्यात यावी. जोपर्यंत चौकशीचा अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत संबंधित कंत्राटदारांना कोणत्याही प्रकारच्या देयकाचे अधिदान करण्यात येऊ नये. याबाबत तातडीने सुधारात्मक कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा मुंबईकरांच्या हितासाठी भारतीय जनता पक्षामार्फत जन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.