राज्यातील चुरशीच्या अशा राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे. अटीतटीची ही लढाई कोण जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांचे मत हे निर्णायक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मतदानानंतर बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही ज्याला निवडून दिलं तोच उमेदवार निवडून येणार असा विश्वास हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
उत्सुकता वाढेल
आपण कोणाला मत दिलं हे कधीही सांगायचं नसत. त्यामुळे मी सुद्धा कोणाला मत दिलं ते सांगणार नाही. पण आम्ही ज्याला निवडून दिलं तोच उमेदवार निवडून येईल, थोड्याच वेळात तुम्हाला ते कळेल, अशी प्रतिक्रिया हितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे. त्यामुळे आता या निकालाची उत्सुकता अजूनच वाढली आहे.
(हेही वाचाः Rajya Sabha Election : मतमोजणीला होणार विलंब, केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागणार)
विभागाचा विकास महत्वाचा
माझ्या विभागाची कामं ही माझ्यासाठी महत्वाची असतात. हे भल्याभल्या नेत्यांना माहीत आहे, त्यामुळे फार काही बोलायची आवश्यकता नाही. आणि विभागाचा विकास होणारच, असा विश्वासही हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community