ईडी कारवाईच्या भीतीने आमच्याकडे येऊ नका मुख्यमंत्र्यांचे जाहीर आवाहन

94

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांच्या औरंगाबाद दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. पत्राचाळ प्रकरणात सध्या संजय राऊत यांची चौकशी सुरू असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्रकार परिषदेत विचारले असता ते म्हणाले, ईडीची चौकशी सुरू आहे, तसंही राऊत म्हणतात मी काही केलेलं नाही चौकशीला सामोरे जाणार, मग कर नाही त्याला डर कशाला असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांना कोणीही भाजपकडे बोलावलेलं नाही, निमंत्रणही दिलेलं नाही ईडी कारवाईच्या भीतीने आमच्याकडे येऊ नका, दबाव टाकून कोणालाही पक्षात घ्यायचं नाही हे मी जाहीर आवाहन करतो असे त्यांनी स्पष्ट केले.

( हेही वाचा : शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या याचिकांवर ३ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी)

आमचं सरकार कालावधी पूर्ण करून पुढच्या निवडणुका सुद्धा जिंकेल

केंद्रीय तपास यंत्रणांनी सूडाने काम केलं असतं तर न्यायलयाने संबंधितांना लगेच दिलासा दिला असता परंतु यापूर्वीची प्रकरणे तुम्ही तपासा एकही सूडाची कारवाई केलेली नाही. आमचं सरकार कालावधी पूर्ण करून पुढच्या निवडणुका सुद्धा जिंकेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.