आम्ही साडेतीन महिन्यांपूर्वी मॅच खेळलो आणि…, भारताच्या विजयानंतर शिंदेंची फटकेबाजी

145

भारताने टी-20 विश्वचषकात पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर देशभरात एकच जल्लोष होत आहे. सर्वच स्तरांतुन टीम इंडियाचे कौतुक होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र यावरून जोरदार फटकेबाजी केली आहे. आम्ही साडेतीन महिन्यांपूर्वी मॅच जिंकली, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे.

सोमवारी ठाण्यात झालेल्या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यावेळी भारत पाकिस्तान मॅचबाबत बोलताना त्यांनी विरोधकांना जोरदार टोले लगावले.

आम्ही मॅच खेळलो आणि जिंकलो

भारतीय संघाने मॅच जिंकली हा एक आनंदाचा क्षण आहे. मॅचमध्ये मेलबर्नच्या क्रिकेट मैदानातही बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पोस्टर झळकले. आम्ही तीन साडेतीन महिन्यांपूर्वी एक मॅच खेळलो आणि ती जिंकलो. आम्ही जनतेचं राज्य आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही सत्तेवर आल्या आल्या आपली संस्कृती जपण्याचा आणि ती पुढे नेण्याचा प्रयत्न केला. राज्यात आता विकासाचे पर्व सुरू झाले आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

ही चांगली नांदी

तसेच राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांवरही शिंदे यांनी यावेळी भाष्य केले. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना,भाजपला चांगले यश मिळाले आहे. भाजपने 397 तर शिवसेनेने 298 जागा मिळवल्या. आपले अनेक सरपंच निवडून आले आहेत. ही एक चांगली नांदी असल्याचंही शिंदे यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.