मुख्यमंत्र्यांना धमकीचे प्रकरणः एकाला अटक,कोणी आणि का केला फोन?

78

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रविवारी एका निनावी फोनवरुन जीवे मारण्याच्या आलेल्या धमकीमुळे राज्यात एकच खळबळ उडाली. आषाढी एकादशीनंतर मुख्यमंत्र्यांना दुस-यांदा ही धमकी आल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान हा धमकीचा फोन कोणी आणि का केला याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला जातोय, अशी खोटी माहिती अविनाश जाधव या तरुणाने पोलिसांना दिली होती. हॉटेल मालकासोबत पाण्याच्या बाटलीवरुन वाद झाल्यामुळे त्याने हा धमकीचा बनाव रचल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांनी अविनाशला अटक केली आहे.

(हेही वाचाः धमकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया)

काय झाले नेमके?

अविनाश हा मुंबईहून सांगलीच्या दिशेने निघाला होता. त्याने थोड्या प्रमाणात मद्यपान देखील केले होते. दारुच्या नशेतच तो एका हॉटेमध्ये गेला आणि त्याने पाण्याची बाटली घेतली. त्यावेळी हॉटेलवाल्यांनी त्याच्याकडून बाटलीचे 5 रुपये जास्त मागण्यात आले. त्यावेळी हे पाच रुपये कशासाठी अशी त्याने विचारणा केली असता परवडत नसेल तर दुसरीकडे जा, असे त्याला हॉटेल मालकाने सांगितले.

धमकीचा बनाव

ही गोष्ट अविनाश वाघमारेला खटकली. त्यामुळेच त्याने 100 नंबर डायल करुन संबंधित हॉटेलमध्ये काही माणसांकडून मुख्यमंत्र्यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचे अविनाशने पोलिसांना सांगितले. त्यामुळे ही धमकीची बतावणी करत अविनाशने यंत्रणांची दिशाभूल केल्याची माहिती पोलिसांना चौकशीअंती समजली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.