CM Eknath Shinde : ‘गर्व से कहो हम हिंदू है’, बोलायची हिंमत उद्धव मध्ये राहिली नाही!

260
Lok Sabha Election 2024: ...त्यांना लागली पराभवाची चाहूल, राजन विचारेंच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांचा जोरदार पलटवार
Lok Sabha Election 2024: ...त्यांना लागली पराभवाची चाहूल, राजन विचारेंच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांचा जोरदार पलटवार
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

शिवसेनाप्रमुखांची शिवतीर्थावरून ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधंवानो’ ही गर्जना देशात गाजत होती. मात्र आज उबाठाला हिंदू म्हणून घ्यायची लाज वाटत आहे. ‘गर्व से कहो हम हिंदू है’, बोलायची हिमंत राहिली नाही आणि हिंदुह्रदयसम्राट म्हणून बोलायला जीभ कचरु लागली आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दादर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील महायुतीच्या जाहीर सभेत बोलतान उबाठावर गेली. मतांसाठी लाचारी करणारे आपण किती बदलू शकतो हे उबाठाने दाखवून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भरभरुन प्रशंसा करणारे आज शिव्याशाप देत आहेत. इतक्या जलद गतीने रंग बदलणारा सरडा कोणी पाहिला नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहिले तर नरेंद्र मोदी घरात घुसुन मारतील, याचा धसका पाकिस्तानने घेतला आहे. मागील १० वर्षात देशात एकही बॉम्बस्फोट झाला नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश मजबूत केला. आज बाळासाहेब ठाकरे असते तर ते बोलले असते मोदी गया तो देश गया, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय (PM Narendra Modi) भारताला पर्याय नाही, असे गौरवौद्गारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी याप्रसंगी काढले.

(हेही वाचा – Pune Airport: दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडकले, विमान उड्डाण रद्द)

महाराष्ट्र का काम, मोदीजी का नाम आणि अयोध्या का राम मागील १० वर्षात त्यांनी एकही सुट्टी घेतली नाही. काहीजणांना पंतप्रधान बनण्याची स्वप्ने पडली आहेत, पण घरात बसून देश चालवणार का अशी खरमरीत टीका त्यांनी उबाठावर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) देश सुरक्षित ठेवला, गरिबांचे कल्याण केले. भ्रष्टाचार रोखला, अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली, लाभार्थींचे पैसे जनधन खात्यात दिले, ८० कोटी जनतेला मोफत रेशन, पाच लाखांचा आरोग्य विमा, महिलांना आत्मनिर्भर केले, बेरोजगारांच्या हाताला काम केले आणि देशाला महासत्तेकडे घेऊन जाणाऱ्या मोदीजींना मत देणार असे प्रत्येक भारतीय मतदार बोलत आहे. महाराष्ट्र का काम, मोदीजी का नाम आणि अयोध्या का राम असे मुख्यमंत्री म्हणाले.

(हेही वाचा – BMC : ‘त्या’ प्रामाणिक सफाई कामगाराची महानगरपालिका आयुक्तांनी थोपटली पाठ; ‘अस्तित्व’ नाटकाची तिकिटे दिली भेट)

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधामध्ये बाळासाहेबांनी स्वतः जोडे मारून आंदोलन केले होते, याची आठवण मुख्यमंत्री यांनी करून दिली. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, काँग्रेसचे गवत उपटून टाका, पण त्याच गवतात उबाठा लोळताना दिसत आहेत, हे दुर्दैव आहे. ज्या काँग्रेसने बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार सहा वर्ष काढून घेतला त्या काँग्रेसला माझ मत असे अभिमानाने उबाठा निर्लज्जपणे सांगतात. त्यांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही. काँग्रेसला साथ देऊन महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत उबाठाने खंजीर खुपसला, अशी टीका त्यांनी केली.

आमच्याकडे शिवसेना तर उबाठाकडे शिव्या देणारी शिव्यासेना असल्याची खरमरीत टीका मुख्यमंत्र्यांनी केली. यामुळे बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक जीव गेला तरी काँग्रेसला मतदान करणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ आणि उबाठाचा हात काँग्रेस के साथ हे जनतेने ओळखले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.