मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक! लॉकडाऊन लावण्याबाबत होणार चर्चा 

कडक निर्बंध लावून तीन दिवस उलटले, तरी गर्दी कमी होताना दिसत नाही. म्हणून सार्वजनिक सुट्यांचे निमित्त करत मुख्यमंत्री ठाकरे पुढील आठवडा लॉकडाऊन करण्याच्या विचारात आहेत.  

84

राज्यात एका बाजूला लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्ण संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत आहे. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुढच्या आठवड्यात संपूर्ण लॉकडाऊन लावायचा का, असा विचार सुरु केला आहे. त्याबाबत निर्णय घेण्यासाठी शनिवारी, १० एप्रिल रोजी सर्व पक्षीय बैठक बोलवली आहे.

आठवड्यातील ३ सार्वजनिक सुट्यांचे निमित्त!

पुढच्या आठवड्यात तीन दिवस सार्वजनिक सुट्या आल्या आहेत. त्यामुळे उर्वरित दिवसांमध्येही लॉकडाऊन लावायचा का, असा विचार मुख्यमंत्री ठाकरे करत आहेत. राज्यात कोरोनाचे थैमान सुरुच आहे. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी सरकार हर तर्हेने प्रयत्न करत आहे. याआधी मुख्यमंत्री ठाकरे यांना राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावायचा होता, मात्र त्याला सत्ताधारी पक्षातील काँग्रेस, राष्ट्रवादीसह, भाजप, मनसेने विरोध केला होता. त्यामुळे त्यांना लॉकडाऊनचा निर्णय न घेता कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर तीन दिवस उलटले तरी गर्दी कमी होताना दिसत नाही. म्हणून सार्वजनिक सुट्यांचे निमित्त करत मुख्यमंत्री ठाकरे हे पुढील आठवडा लॉकडाऊन करण्याच्या विचारात आहेत.

(हेही वाचा : ब्रेक दि चेनः रेल्वे स्थानकांवर शुकशुकाट! )

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना काढणार?  

यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी, १० एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, त्या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहे. वाढती रुग्ण संख्या आणि कडक निर्बंध लादून ही परिस्थितीत बदल नाही, त्यामुळे कोरोनाबाबत करावयाच्या उपाययोजनाबाबत या बैठकीत पुन्हा चर्चा होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.