समान नागरी कायदा लागू करण्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

95

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरात निवडणुकीत देशात सामान नागरी कायदा लागू करण्यात येणार, असे म्हटले, तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही सामान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे, असे म्हटले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वेळी राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यात येईल, असे म्हटले.

मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो

राज्यात समान नागरी कायद्याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘संविधानाने प्रत्येक राज्याला समान नागरी कायदा लागू करण्याचे अधिकार दिले आहेत. काही कारणांमुळे आपल्या देशात हे होऊ शकले नाही. आता हा कायदा गोव्यात आहे. उत्तराखंड देखील हा कायदा लागू करणार आहे. हिमाचल करणार आहे, गुजरात देखील करणार आहे. मला वाटते हळूहळू सगळेच राज्य हे करणार आहेत. महाराष्ट्रही योग्य वेळी याचा विचार करणार. आज मी याबद्दल अधिकृत घोषणा करू शकत नाही. याच कारण म्हणजे अशी कोणतीही घोषणा करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. मात्र मला असे वाटते संविधानाने आपल्यावर ही जबाबदारी टाकली आहे की, आपण आपल्या राज्यात समान नागरी कायदा आणावा, असेही फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा IFFY 2022 : नदव लॅपिड यांना उपरती; म्हणाले, ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा उत्कृष्ट)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.